शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

कोरोना निवळल्यानंतरच महापालिकेसह अन्य निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:16 AM

कोल्हापूर : कोरोना काळात कोणत्याही निवडणुका घेतल्या जाणार नसल्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोनाची साथ पूर्णपणे निवळल्याशिवाय महापालिकेसह कोणत्याही ...

कोल्हापूर : कोरोना काळात कोणत्याही निवडणुका घेतल्या जाणार नसल्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोनाची साथ पूर्णपणे निवळल्याशिवाय महापालिकेसह कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार नाहीत, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. मराठा आरक्षण आता केंद्र सरकारच्या हातात असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

रविवारी खासगी दौऱ्यानिमित्ताने कोल्हापुरात आलेल्या तनपुरे यांनी शासकीय विश्रामगृहावर काही काळ मुक्काम केला. यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य शासनाची निवडणुका, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि महाविद्यालयीन फीच्या संदर्भातील विषयांवर भूमिका मांडली.

निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलताना तनपुरे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी होती, पण कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने ते अनिश्चित काळासाठी पुढे गेले. जोपर्यंत हे वातावरण पूर्णपणे निवळत नाही, तोवर कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेण्याच्या विचारात सरकार नाही. मराठा आरक्षणाबाबतीत विचारलेल्या प्रश्नावर १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे हा विषय आता केंद्र सरकारच्या कक्षेत गेला आहे. राज्य सरकारच्या अखत्यारित जितके आहे, तितके केले आहे,अजूनही केले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेच घटना दुरुस्तीचे विधेयक आणून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबतीतील निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर यावर अजून अभ्यास सुरु आहे. राज्य सरकार म्हणणे मांडण्याची तयारी करत असल्याचे सांगितले.

शाळा, महाविद्यालयीन फीच्या संदर्भात पालकांच्या भावना समजून घेतल्या आहेत. अनावश्यक फी कपातीसंदर्भात राज्य शासन गांभीर्याने विचार करत असून, लवकरच धोरण जाहीर केले जाईल, असेही तनपुरे यांनी सांगितले.