शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

..अन्यथा दारोदारी फिरून पंतप्रधान कोण हे सांगायची वेळ आली नसती; जयंत पाटलांचा बावनकुळेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 3:46 PM

नितीन भगवान पन्हाळा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पक्ष राहिलेला नाही असा आरोप केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष ...

नितीन भगवानपन्हाळा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पक्ष राहिलेला नाही असा आरोप केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बावनकुळे यांची खिल्ली उडवली आहे. आमदार गेले म्हणून जनाधार गेला असे होत नाही. असे समजण्याचा गैरसमज ही करू नये. अन्यथा तुम्हाला दारोदारी फिरून पंतप्रधान कोण हे सांगण्याची वेळ आली नसती. असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. पन्हाळ्यावर महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन प्रसंगी विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवाब मलिक यांना बाहेर बोलण्यास कोर्टाने मज्जाव केला आहे. त्यामुळे ते असं कुठेही बोलले नाहीत. नवाब मलिक अजित पवार गटासोबत जात आहेत असं प्रसार माध्यमामधूनचं मी ऐकलं असल्याचं जयंत पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकी संदर्भात अद्याप आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे इंडियामध्ये सहभागी झाले असल्याचे पाटील यांनी सांगितले. शरद पवार यांची बाजू भक्कमच आहे, त्यात शंका घेण्याचा काय आहे ? दुसरी बाजू त्यांच्या मताप्रमाणे दावा करणारच मात्र पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहे. आमदार गेले म्हणून पक्ष त्यांच्या पाठीमागून जात नाही, असं  सुप्रीम कोर्टानेच शिवसेनेच्या बाबतीत भाष्य केलं आहे. देशातील पदाधिकाऱ्यांनी अफेडिव्हिड करून दिलेला आहे. ज्यामध्ये शरद पवार यांनाच अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे. राज्यकर्तेचं जबाबदार नांदेडची घटना अत्यंत गंभीर आहे. औषध खरेदी करण्याचा निर्णय या सरकारमधील मंत्र्यांना घेतला तोच निर्णय या गोष्टीला कारणीभूत आहे. नाहीतर नांदेडची घटना घडलीच नसती. आमच्या सरकारच्या काळात विकेंद्रीत खरेदी करण्याची व्यवस्था होती. मात्र या सरकारच्या काळात संबंधित मंत्रांनी स्वतःकडे अधिकार घेतलेले आहेत. महत्त्वाचे निर्णय योग्य वेळेस झालेले नसतील, औषधांचा तुटवडा संपूर्ण महाराष्ट्रात जाणवला असेल त्यामुळे मंत्रीच यास जबाबदार असतील, जर मंत्रीच असं म्हणत असतील की मंत्री जबाबदार आहेत तर राज्यकर्ते या गोष्टीला जबाबदार असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.पवारांच्यामुळे आम्हाला नेतृत्व करण्याची संधी शरद पवारांच्या 25 वर्षाच्या नेतृत्वामुळे आम्हा सर्वांना सत्तेत बसण्याची संधी मिळालेली आहे. गेली 17 ते 18 वर्षे सगळेजण जवळपास हे मंत्री राहिलेले आहेत. त्यावेळी शरद पवार साहेबांची कृती त्यांना अडचणीची वाटली नाही. आज त्यांची अडचण निर्माण झाली म्हणून सगळा दोष शरद पवारांवर देऊन त्यांचा पक्ष काढून घेण्याचा जो प्रकार आहे तो भारतातील जनता मान्य करेल असं वाटत नाही.नाना पटोले यांच्या यादीवर पक्षश्रेठी विचार करतीलनाना पटोले यांनी दिलेल्या यादीमध्ये एखाद्याचे नाव पुढे मागं होऊ शकते. त्यात विशेष बाब काही नाही. पटोलेंच्या यादीवर पक्षश्रेष्ठी सुद्धा विचार करतील. असे जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJayant Patilजयंत पाटीलChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेprime ministerपंतप्रधान