शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

शिरोळ तालुक्यात पंचगंगा काळीकुट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:57 AM

कुरुंदवाड : पंचगंगा नदीला काळेकुट्ट पाणी आले असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात ...

कुरुंदवाड : पंचगंगा नदीला काळेकुट्ट पाणी आले असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, दूषित पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यासाठी जीवनदायी आहे. मात्र, नदीपात्रात औद्योगिक कारखान्यांचे सांडपाणी, मैलायुक्त सांडपाण्यामुळे नदी पूर्णपणे प्रदूषित बनली आहे. त्यातच नदीपात्राला जलपर्णीचा विळखा, आदी कारणांमुळे जीवनदायी नदी मरणदायी ठरली आहे.पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलन केले. मात्र, ही आंदोलने काही काळापुरतीच केल्याने प्रश्न तसाच राहिला. काही महिन्यांपूर्वी आमदार उल्हास पाटील यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी जागर यात्रा काढली. संगम ते उगमापर्यंत पदयात्रेतून पंचगंगा काठच्या नागरिकांना जागे, तर नदी प्रदूषण करणारे घटक, प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाला इशारा देण्यात आला. या आंदोलनामुळे नदी प्रदूषण मुक्तीकडे वळेल, अशी आशा होती. मात्र, जागर मोर्चा हा केवळ आंदोलनापुरताच राहिला. पुन्हा ये रे माझ्या मागल्या... या उक्तीप्रमाणे आमदारांना व प्रदूषण नियंत्रण मंडळालाही याचा विसर पडला आहे.सध्या तीव्र उन्हाळा जाणवत असताना व पात्रातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असताना औद्योगिकीकरणाचे व सांडपाणी थेट नदीत सोडल्यामुळे नदीपात्रातील पाणी काळेकुट्ट बनले असून, पाण्याला उग्र वास येत आहे. धरणातून पाणी सोडले तरी पाण्याच्या प्रवाहाबरोबर सांडपाणी पुढे ढकलत येऊन शिरोळ तालुक्यात स्थिरावते. त्यामुळे दूषित पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीकाठावरील गावांना बसत आहे. याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.