शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 1:42 PM

७८ बंधारे पाण्याखाली; कोल्हापूर-गगनबावडा मार्ग ठप्प; नदीकाठचे नागरिक स्थलांतराच्या तयारीत 

कोल्हापूर : जिल्ह्यात काल, रविवारी सकाळपासून धुवाधार पावसामुळे पुराचे पाणी वाढू लागले आहे. आज, सोमवारी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे. पावसाचा जोर आणि धरणातून होणारा विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली गेले असून, कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर सायंकाळी तीन ठिकाणी पाणी आल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.आज, सकाळपासून शहरात पावसाने उघडीप घेतली. काल, रविवार जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा तालुक्यात अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस कोसळत आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. कोल्हापूर शहरात तर रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. एकसारखा पाऊस आणि हवेत कमालीचा गारठा जाणवत होता. राज्य, प्रमुख जिल्हा व ग्रामीण असे ३३ मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाल्याने जिल्ह्यातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.राधानगरी धरण ८० टक्के भरले असून, स्वयंचलित दरवाजाजवळ पाणी पोहोचले आहे. रविवारी दिवसरभरात धरणात तब्बल एक टीएमसी पाणी वाढल्याने रात्रभर असाच पाऊस राहिला तर आज, सोमवारी धरणाचे एक-दोन स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दरम्यान, पावसाचा जोर पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे यासह पूरबाधित इतर गावांतील नागरिकांनी स्थलांतराची तयारी केली आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर स्थलांतर सुरू केले जाईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

‘राधानगरी’ ८०, तर ‘वारणा’ ७२ टक्क्यांवरधरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने जलाशयात झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत ‘जांबरे’, ‘घटप्रभा’, ‘जंगमहट्टी’, ‘आंबेओहोळ’ ही चार धरणे भरली आहेत. ‘कडवी’ ९५ टक्क्यांवर असून, ते कोणत्याही क्षणी भरू शकते. राधानगरी धरण ८० टक्के, तर वारणा ७२ टक्के भरले आहे. आणखी दोन दिवस असाच पाऊस सुरू राहिला; तर दोन्ही धरणे भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला महापुराला सामाेरे जावे लागणार आहे.म्हणूनच पुराचे पाण्याला संथगती‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘वारणा’ ही धरणे भरलेली नाहीत. ‘राधानगरी’ व ‘वारणा’तून वीजनिर्मितीसाठीच विसर्ग सुरू आहे. त्यात अलमट्टीतून विसर्ग प्रतिसेंकद सव्वा लाख घनफूट सुरू असल्याने पुराचे पाणी संथगतीने वाढत आहे. त्यामुळेच रविवारी दिवसभरात ‘पंचगंगे’ची पातळी अवघ्या दोन इंचांनी वाढली आहे.

आठवडी बाजारावरही परिणामकोल्हापूर शहरात रविवारी आठवडी बाजार असतो; पण दिवसभर सुरू असलेल्या संततधारेमुळे नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे बाजारावरही पावसाचा परिणाम जाणवत होता.

  • बंधारे पाण्याखाली : ७८
  • पंचगंगेची पातळी : ३९.२ फूट
  • राज्य, प्रमुख जिल्हा व ग्रामीण मार्ग बंद : ३३
  • पडझड : ८ घरे ( सुमारे ६ लाखांचे नुकसान)
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीDamधरण