शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अन्नदात्याच्या न्यायासाठी कोल्हापुरातील साहित्यिकांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 18:37 IST

FarmarStrike, literature, kolhapur अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या चारही सीमांवर गेल्या २३ दिवसांपासून न्यायासाठी टाहो फोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता कोल्हापुरातील चाळीसहून अधिक साहित्यीक गुरुवारी एकत्र आले आहेत.

ठळक मुद्देअन्नदात्याच्या न्यायासाठी कोल्हापुरातील साहित्यिकांचा पाठिंबा चार टप्प्यांत होणार आंदोलन

कोल्हापूर : अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या चारही सीमांवर गेल्या २३ दिवसांपासून न्यायासाठी टाहो फोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता लेखणीही पुढ सरसावली आहे.

कोल्हापुरातील चाळीसहून अधिक साहित्यीकांनी गुरुवारी एकत्र येऊन या आंदोलनात सक्रीय होऊन मातीचे ऋण फेडण्याचा निश्चय केला. नुसता पाठींबा देऊन न थांबता यात सक्रीयपणे उतरण्यासाठी चार टप्प्यात आंदोलनाची दिशाही ठरवण्यात आली.गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन लेखक चंद्रकुमार नलगे, आप्पासो खोत, प्रा. शरद गायकवाड,राजाभाऊ शिरगुप्पे, शिवाजीराव परुळेकर, किसन कुराडे, संजय सौंदलगे यांनी साहित्यीकांच्या वतीने भूमिका स्पष्ट केली.असे असणार आंदोलनाचे टप्पे

  • पहिला टप्पा: अन्यायकारक कायदे मागे घेऊन अन्नदात्याला न्याय देण्याची मागणी देणारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
  • दुसरा टप्पा: कोल्हापुरातील सर्व साहित्यीक राष्ट्रीपती व पंतप्रधान यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती करणार
  • तिसरा टप्पा: शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांच्याकडून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पोस्टकार्ड लिहून पंतप्रधानांना पाठवणार
  • चौथा टप्पा: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार

हे साहित्यीक होणार सहभागीडॉ. सुनिलकुमार लवटे, चंद्रकुमार नलगे, आप्पासो खोत, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. राजन गवस, राजाभाऊ शिरगुप्पे, प्रा. शरद गायकवाड, डॉ. रविद्र ठाकूर, प्रा. किसनराव कुराडे, डॉ. रणधीर शिंदे, प्रा.गोमटेश पाटील, राजन कोनवडेकर, महावीर कांबळे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अरुण शिंदे, प्रा. ए.डी.कुंभार, रमेश जाधव, संजय खोचारे, रविंद्र गुरव, एकनाथ पाटील, गोविंद पाटील, शाम कुरळे, रा.तू.भगत, रजनी हिरळीकर, अशोक पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, चंद्रकांत निकाडे, जीवनराव साळोखे, डॉ. मारुती गुरव, विश्वास सुतार, परशराम आंबी, निलम माणगावे, राजंद्र पाटील, मनोहर मोहिते, संजय मगदूम, संजय सौंदलगे, डॉ. राजेंद्र कुंभार, दिनकर पाटील, सुभाष विभुते, बा.स.जठार, टी.आर.गुरव, जुई कुलकर्णी.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपliteratureसाहित्यkolhapurकोल्हापूर