शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

राज्यातील लोकप्रतिनिधी कमी पडतात

By admin | Published: April 02, 2016 12:25 AM

ज्ञानेश्वर मुळे यांची खंत : दोनदिवसीय पासपोर्ट शिबिराचे उद्घाटन

कोल्हापूर : दिल्लीतून इतर राज्यांतील लोकप्रतिनिधी आपल्या राजकीय बळाचा वापर करून जनतेची कामे करून घेतात; परंतु महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी त्या तुलनेत कमी पडतात, अशी खंत कॉन्सुलर पासपोर्ट, व्हिसा विभागाचे अतिरिक्त सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. यावर दिल्ली येथे मराठी नेते व लोकप्रतिनिधींचे लॉबिंग कमी पडते, यात राज्य शासनाने पुढाकार घेऊन सर्वांमध्ये समन्वय ठेवावा, अशी प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात केंद्र सरकारच्या विदेश मंत्रालयातर्फे आयोजित दोनदिवसीय पासपोर्ट शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित होते. पहिल्या दिवशी १५० जणांच्या पासपोर्टचे काम करण्याची प्रक्रिया झाली.मुळे म्हणाले, पासपोर्ट हा व्यक्तीच्या आर्थिक सशक्तीकरणाचे माध्यम बनला आहे. जग समजून घेणे, व्यवसाय, शिक्षण यासाठी देश-विदेशातील प्रवास महत्त्वाचा आहे. त्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. लोकांना एकमेकांशी जोडणे हे आपले ध्येय आहे. पासपोर्ट हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही सक्षम कारणाशिवाय पासपोर्ट नाकारता येत नाही. दरवर्र्षी परदेशातील ७० लाख लोक विविध कारणांनी भारतात येतात; तर भारतातील सुमारे १ कोटी ५० लाख लोक परदेशी जातात. त्यांच्याशी संबंधित पासपोर्ट, व्हिसाविषयक कामांमध्ये हे कार्यालय जनताभिमुख झाले आहे. भारत सरकार पासपोर्ट सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे पासपोर्ट वितरणामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. ते पहिल्या क्रमांकावर यावे, अशी अपेक्षा आहे.खा. शेट्टी म्हणाले, कोल्हापूरला पासपोर्ट कार्यालय व्हावे. ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्या गुन्ह्यांचे स्वरूप पाहून पासपोर्ट दिले जावेत. यावेळी खा. महाडिक व अतुल गोतसुर्वे यांचे भाषण झाले. पासपोर्ट कार्यालयाचे प्रोटोकॉल इन्चार्ज जतिन आर. पोटे यांनी स्वागत केले. गोतसुर्वे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मराठी लोकप्रतिनिधींच्या लॉबिंगची गरजदिल्लीत महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींचे बळ कमी पडते, या ज्ञानेश्वर मुळे यांच्या वक्तव्यावर खासदार शेट्टी म्हणाले, दिल्लीत मराठी नेते, अधिकाऱ्यांचे लॉबिंग कमी पडते, हे मुळे यांना सांगावयाचे होते. यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन मराठी नेते व अधिकाऱ्यांचा समन्वय ठेवून महाराष्ट्र सदनाचा विकासाभिमुख कामांसाठी उपयोग करावा.