शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

तावडेंनी वादात तेल ओतले, प्रकाश आंबेडरांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 5:07 AM

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा जसा बट्ट्याबोळ केला, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचे होणार आहे. ‘टिस’च्या समितीची मानसिकता पाहता, हे सरकार गेल्यानंतरच अहवाल येण्याची शक्यता असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

कोल्हापूर - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा जसा बट्ट्याबोळ केला, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचे होणार आहे. ‘टिस’च्या समितीची मानसिकता पाहता, हे सरकार गेल्यानंतरच अहवाल येण्याची शक्यता असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.सोलापूर विद्यापीठ नामांतरप्रश्नी धनगर व लिंगायत समाजांत सरकारने वाद निर्माण केला असून, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यात तेल ओतण्याचे काम केल्याची टीकाही त्यांनी केली.अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले, कॉँग्रेसने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला. त्यामुळे या समाजाने भाजपला पाठबळ दिले; पण त्यांनीही फसवणूक केली आहे.आता ‘टिस‘ (टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स) या संस्थेतर्फे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. यासाठी समितीचे काम सुरू असतानाच मंत्री विनोद तावडे यांनी आहिल्यादेवींचे नाव दिले तर दंगल उसळेल, असे वक्तव्य केले.त्यानंतर, समिती सदस्यांनी बसवेश्वरांचे नाव पुढे केले. धनगर व लिंगायत समाजांत वाद निर्माण करायचा आणि आपली सत्ता अबाधित ठेवण्याचे राजकारण भाजप करीत आहे. अहिल्यादेवींचे कार्य साऱ्या महाराष्टÑाला माहिती आहे. त्यांच्या नावावर वादंग उठणेच अशक्य आहे.या वादावर पडदा टाकायचा झाल्यास तावडेंनी माफी मागायला हवी, असे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.पंढरपुरात २० मे रोजी ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’आलुतेदार-बलुतेदारांना एकत्र करून सत्ता हस्तगत करायची आणि सत्तेच्या माध्यमातूनच आपले प्रश्न मार्गी लावायचे आहेत, त्यासाठी २० मे रोजी पंढरपुरात सत्ता संपादन निर्धार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहितीही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्र