शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"...तर राज्यातील ‘शिंदे सरकार’ कोसळणार"; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

By संतोष.मिठारी | Updated: September 18, 2022 18:53 IST

काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आमच्यासमवेत समझोता करायचा असेल तर आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर  - मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याने जर पेचप्रसंग निर्माण झाला असेल, तर राज्यपालांची संविधानिक जबाबदारी आहे की, त्यांनी तशा प्रकारचा अहवाल राष्ट्रपती यांच्याकडे पाठविला पाहिजे. राष्ट्रपती जे मार्गदर्शन करतील, त्यानुसार त्यांनी निर्णय दिला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे राज्यपालांनी असा अहवाल राष्ट्रपती यांना पाठविलेला नाही. त्यामुळे संविधानिक पेचप्रसंग निर्माण झाल्याचे सर्वोच्य न्यायालयाचे मत झाल्यास राज्यातील ‘शिंदे सरकार कोसळणार’ अशी परिस्थिती असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

आघाडीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी मेळाव्यानिमित्त ते कोल्हापुरात आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकार जरी गेले, तरी सभागृह बरखास्त होणार नाही. एका स्टे ऑर्डरवर तीन महिने सरकार चालले आहे. ते अत्यंत गंभीर आणि देशाच्या दृष्टिकोनातून घातक आहे. १६ आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय द्यावा लागेल. राजाचा वाढदिवस लोकांनी साजरा करावा, असे आता सुरू झाले आहे. या देशात चित्तादेखील कधी आणावा? त्याचा मुहूर्त पंतप्रधानांच्या वाढदिवसाचा असावा. हे जिथे ठरले जाते, तिथे राजेशाही नव्याने सुरू झाल्याचे लोकांनी लक्षात घ्यावे. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राज्यात भाजप अथवा त्यांच्यासमवेत जाणाऱ्या मित्रपक्षांसमवेत आम्ही जाणार नाही. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आमच्यासमवेत समझोता करायचा असेल तर आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आघाडीचे पक्षनिरीक्षक सोमनाथ साळोखे, क्रांती सावंत, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, विलास कांबळे आदी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले

१) म्यानमारमधील कडधान्य खासगी व्यापाऱ्यांऐवजी केंद्र सरकारने घेतले असते, तर महागाईवर नियंत्रण ठेवता आले असते.

२) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वेदांताने केलेली चर्चा अथवा प्रस्ताव कधी दिला, याची तारीख त्यांनी जाहीर करावी. त्यामुळे आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे अथवा नाही, ते स्पष्ट होईल.

३) काँग्रेसवर त्यांचे मित्रपक्ष टीका करत आहेत की, भारत जोडो यात्रा भाजपच्या राज्यांऐवजी इतर राज्यांत दिसत आहे, त्याचा खुलासा काँग्रेसकडून होत नाही. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी