शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

Kolhapur: विधानसभेसाठी आश्वासन घेऊन प्रकाश आवाडे यांची माघार, उपमुख्यमंत्र्यांशी झाली चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 12:32 IST

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जाहीर केला निर्णय

कोल्हापूर : आगामी सहा महिन्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने आपला विचार करावा, असा आग्रह इचलकरंजी मतदारसंघातील भाजपाचे सहयोगी सदस्य आमदार प्रकाश आवाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला. त्यासंदर्भात काही आश्वासन मिळाल्यानंतरच आवाडे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे जबाबदार सूत्रांकडून सांगण्यात आले.तिथे भाजपाचे सुरेश हाळवणकर आणि आवाडे यांच्यात विधानसभेच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच होणार आहे. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले आहेत. आमदार आवाडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत रविवारी रात्री झालेल्या चर्चेत भाजपाचे माजी आमदार हाळवणकर यांच्याबद्दल तक्रारी केल्याचे समजते. त्यांचा माझ्या प्रत्येक कामात हस्तक्षेप होत आहे. अशा स्थितीत सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत आपण आम्हाला कोणते संरक्षण देणार आहात, अशीही विचारणा आवाडे यांनी केली.त्यासंदर्भात काही ठोस शब्द घेतल्यानंतरच आवाडे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी कोल्हापुरातील निवासस्थानी अर्धा तास चर्चा केल्यानंतर शिंदेसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीत ते सहभागी झाले.मुख्यमंत्री शिंदे यांची आवाडे यांच्याशी कोल्हापुरात शनिवारी सायंकाळी चर्चा झाली; परंतु, तरीही ते माघार घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे ते निवडणूक लढवणार, अशी हवा झाली. तेव्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तुमच्या अडचणी, भावना त्यांच्या कानावर घाला आणि निर्णय घ्या, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यावर आवाडे यांनी मी सर्वांचाच मान राखून निर्णय घेतो, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी मुख्यमंत्र्यांशी त्यांची येथील निवासस्थानी सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यावेळी राहुल आवाडे, मौसमी आवाडे, किशोरी आवाडे, स्वप्नील आवाडे, मंत्री शंभूराज देसाई, विनय कोरे, विजय शिवतारे, रामदास कदम आदी उपस्थित होते. चर्चेवेळी मात्र आवाडे कुटुंबीय आणि मुख्यमंत्री एवढेच उपस्थित होते.

डिजिटलवर आमच्या फोटोचीही ॲलर्जी..

गेल्या पाच वर्षांत खासदार माने यांनी आपल्याला कोणत्याच टप्प्यावर विश्वासात घेतलेलं नाही. त्यांच्या डिजिटल फलकावरही त्यांनी कधी आमचा फोटो लावला नाही, एवढी त्यांना आवाडे यांची ॲलर्जी होती. इचलकरंजीच्या अनेक कामांत त्यांनी आमच्या राजकीय विरोधकांनाच बळ दिले. महापालिकेतील अनेक कामे होऊ नयेत, यासाठी त्यांनी ताकद लावली. कृष्णा योजनेची पाइपलाइन बदलण्याचे काम असो की सहा जलकुंभांचे काम मंजूर असतानाही ते त्यात आडवे पडल्याची नाराजी आवाडे यांनी यावेळी बोलून दाखवल्याचे समजते.

मूळ दुखणे..इचलकरंजी शहराच्या राजकारणात खासदार माने यांनी भाजपाचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा हात घट्ट धरला आहे. विधानसभेलाही ही जोडी एकत्र राहू शकते. हाळवणकर आणि आवाडे यांच्यात राजकीय संघर्ष आहे. त्यात माने हे हाळवणकर यांना मदत करत असल्याचा रागही आवाडे यांच्या उमेदवारीमागे होता व आहे.

असाही एक गुंता..खरंतर, गेल्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल आवाडे हेच संभाव्य उमेदवार म्हणून तयारी करत आहेत. या वेळेलाही त्यांनी तशी घोषणा केली होती; परंतु, कोणत्याच पक्षाकडून त्यांना फारसे पाठबळ मिळाले नाही. शिवाय राहुल उभे राहिले आणि त्यांनी माघारच घेतली नाही तर भाजपा व मुख्यमंत्र्यांशी असलेले चांगले संबंध बिघडू नयेत म्हणून स्वत: प्रकाश आवाडे यांनीच निवडणूक लढविण्याची घोषणा केली व आवाडे गटाची ताकद दाखवून माघार घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणichalkaranji-acइचलकरंजीPrakash Awadeप्रकाश आवाडे