शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

शालेय स्तरावरच होणार स्पर्धा परीक्षेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 11:57 PM

राज्य सरकारचा निर्णय : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; गरीब, गरजू व हुशार मुलांना उपयोग होणार

भरत शास्त्री-- बाहुबली --लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अन्य राज्याच्या तुलनेत राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. या उद्देशाने राज्य सरकार शिक्षण विभागाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र निर्माण करणार आहे.शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन यश संपादन करावे, हा या मागचा हेतू आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याने एमपीएससी, यूपीएससी, आयएएस, आयपीएस, आदी स्पर्धा परीक्षांची माहिती शालेय स्तरावरून देण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीतील मुले या मार्गदर्शन केंद्रांमुळे स्पर्धा परीक्षांकडे वळतील, अशी आशा सरकारला आहे.हे मार्गदर्शन केंद्र माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत असणार असून, राज्यातील सर्व माध्यमिक शिक्षण विभागांना असे केंद्र शालेय स्तरावर स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाने अल बोगिरवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.या समितीतील तज्ज्ञांनी नागरी सेवा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये असणारा न्यूनगंड, परीक्षेची काठिण्य पातळी, गैरसमज, माहितीचा अभाव यामुळे हुशार विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे पाठ फिरवितात, असे निरीक्षण मांडले आहे. त्यामुळेच या समितीच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेची मदतदेखील घेण्यात येणार आहे. ही बाब उल्लेखनीय आहे. या केंद्रांतर्गत विद्यार्थ्यांसाठी शिबिरांचे आयोजन करणे, ग्रामीण भागातील शिक्षकांना माहिती देऊन त्यांना प्रेरित करणे, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंदांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची ओळख होऊन त्याची भीती देखील निघून जाण्यास मदत होईल.गोमटेश बेडगे, मुख्याध्यापक, एम. जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली.केंद्राची रूपरेखाशिक्षकच मुलांना मार्गदर्शन करणारगरजेनुसार जिल्ह्यातील यशस्वी अधिकारी मार्गदर्शन करणारस्पर्धा परीक्षेची भीती, न्यूनगंड व गैरसमज दूर करण्यासाठी मदत होणारसर्वाधिक लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना