शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Kolhapur: लोकसभेसाठी महायुती सावध; महाआघाडीच्या जोरबैठका, शिवसेनेच्या दोन्ही गटात ‘सामना’ शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 14:18 IST

महायुतीच्या पातळीवर वरिष्ठ पातळीवर जोडण्या लावल्या जात असल्या तरी स्थानिक पातळीवर अद्याप शांतता

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित आहेत. मात्र, विविध खासगी संस्थांकडून येणारे सर्व्हे पाहता भाजपने सावध हालचाली सुरू केल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी जोरबैठका मारण्यास सुरुवात केली आहे. सर्वच पक्षातील अंतर्गत हालचाली पाहता, कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटातच ‘सामना’ रंगण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर महायुतीला एकतर्फी लढाई वाटत असली तरी सध्याचा अंंडर करंट पाहता निकराची झुंज पहावयास मिळणार हे निश्चित आहे.भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकायच्याच या इराद्याने काम सुरु केले. त्यातूनच शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेसमधील मातब्बरांना सोबत घेऊन महाविकास आघाडीचे गणीत बिघडवून टाकले आहे. कोल्हापूर जिल्हा हा कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, मागील निवडणूकीपासून जिल्ह्यातील राजकीय गणीत बदलली आहेत.गेल्या वेळेला ‘कोल्हापूर’मधून शिवसेनेचे संजय मंडलीक तर ‘हातकणंगले’तून धैर्यशील माने हे विजयी झाले. गेल्या पाच वर्षात अनेक स्थित्यांतरे झाली आहेत, शिवसेना फुटीनंतर दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली. गेली वर्षभर महाविकास आघाडी व युतीमध्ये सरळ सामना होईल, असे वाटत असताना राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये फुट पडल्याने महायुतीची ताकद वाढली आहे.महायुतीकडून विद्यमान खासदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दोनपैकी एक जागा घेण्याच्या हालचाली भाजपांतर्गत सुरू आहेत. मग, यातीलच एकाला ‘कमळ’ चिन्हावर लढवायची की इतर पर्याय द्यायचा, याची चाचपणीही सुरू आहे. सध्या तरी महायुतीमध्ये शिवसेनेला ही जागा सोडली जाणार असेच चित्र आहे.महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना त्यांनी ‘कोल्हापूर’च्या जागेवर दावा केला होता. आता फुटीनंतरही त्यांनी दावा सोडलेला नाही. पण, ही जागा आपली असल्याने आम्हाला सोडावी, असा प्रयत्न शिवसेनेचा आहे. तर, सहापैकी तीन विधानसभेचे, तर दोन विधानपरिषदेचे आमदार असल्याने ताकद अधिक असल्याचा दावा काँग्रेसचा आहे.महायुतीच्या पातळीवर वरिष्ठ पातळीवर जोडण्या लावल्या जात असल्या तरी स्थानिक पातळीवर अद्याप शांतता दिसत आहे. काँग्रेसकडून राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. तर महाविकास आघाडीकडून डॉ. चेतन नरके यांनी गाव टू गाव संपर्क माेहीम राबवत वातावरणनिर्मिती केली आहे.

एकंदरीत ‘मातोश्री’वरील हालचाली पाहता, ‘कोल्हापूर’मध्ये शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातच ‘सामना’ होण्याची दाट शक्यता आहे.अशी आहे उमेदवारांची चर्चा :कोल्हापूर -महायुती : संजय मंडलिक, धनंजय महाडिकमहाविकास आघाडी : डॉ. चेतन नरके, बाजीराव खाडे, संजय घाटगे, विजय देवणे

हातकणंगले -महायुती : धैर्यशील मानेमहाविकास आघाडी - मुरलीधर जाधव, राजू शेट्टी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी