शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

लाडक्या बहिणींना दीड हजार दिले, फोडणीला चार हजार गेले; आर्थिक बजेट कोलमडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 16:11 IST

महागाईचा उच्चांक 

कोल्हापूर : दिवाळीच्या तोंडावर रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर भडकले आहेत. परिणामी शासनाने दर महिन्याला महिलांना दीड हजार रुपये दिले. मात्र महागाईमुळे त्यांचे दर महिन्याला कमीत कमी चार हजार रुपये जात आहेत, असे सध्याचे चित्र आहे. यामुळे लाडक्या बहिणीची फोडणी महाग झाली आहे. ज्वारीने तर किलोला अर्धशतक पूर्ण केल्याने गरिबांची भाकरी ताटात अधूनमधून येत आहे.ऐन सणाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकले आहेत. कांदा, बटाटा आणि टोमॅटो तर चाळीस रुपयांच्या आत येण्याचे नावच काढलेले नाही. गरीब, दोन ते चार सदस्य असलेल्या कुटुंबांना दर महिन्याला जीवनावश्यक वस्तूंसाठी पूर्वी दोन ते तीन हजार रुपये लागत होते. आता चार ते पाच हजार रुपये लागत आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबालाही दरवाढीचा जबर फटका बसला आहे. वीज, मोबाइल रिचार्ज, इंधन, गॅसचे, दुधाचे दर तर आधीच वाढले आहेत.आता जीवनावश्यक वस्तूंतही घसघशीत वाढ झाल्याने गरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांच्या हातात पैसेच शिल्लक राहत नसल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या सरकारने महिलांच्या खात्यावर दर महिना दीड हजार रुपये जमा केले. पण त्याचवेळी खाद्य तेल, डाळ आदी खाद्य वस्तूंमध्ये वाढ झाली आहे.गहू, तांदळाने पन्नाशी ओलांडलेलीच..दैनंदनीत जेवणात लागणारी भाकरी, चपाती, भातासाठी ज्वारी, गहू, तांदळाच्या दरानेही पन्नाशी ओलांडली आहे. डाळींनी शंभरी ओलांडली आहे. गेल्या चार, पाच महिन्यांपासून याचे दर कमी झालेले नाहीत. खानावळीतील जेवणाचे दरही ताटाला कमीत कमी १० ते ३० रूपयांनी वाढवले आहेत. कोल्हापुरात आता शाकाहारी ताटाला कमीत कमी शंभर रुपये मोजावे लागत आहेत.

अलीकडे वाढ झालेल्या वस्तूंचे दर असेवस्तू   :  जुना दर : नवीन दरखाद्य तेल : ११० ते १२० : १४० ते १५५हरभरा डाळ : १०० : ११० ते ११५रवा, मैदा : ४४ : ४८कांदा :  २५ ते ३० :  ४० ते ५०बटाटा :  २५ : ३० ते ४०

सरकारने लाडकी बहिणी म्हणून दीड हजार देण्याऐवजी महागाई कमी केली असती दर बरे झाले असते. महिलांचे पैसे वाचले असते. - संध्या गायकवाड, गृहिणी, जिवबानाना पार्क, कोल्हापूर. 

खाद्यतेल, रवा, बेसन, हरबरा डाळीचे दर भडकले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. दोन हजार रुपयांत होणाऱ्या बाजाराला चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. - रेश्मा देवार्डे, गृहिणी, शासकीय विश्रामगृह परिसर, कोल्हापूर

दर वाढल्याने दर महिन्याच्या घर खर्चात दोन ते अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे. कुटुंब चालवताना आर्थिक कसरत करावी लागत आहे. -मेघना गावडे, फुलेवाडी, कोल्हापूर

महागाई वाढवून दुसऱ्या बाजूने चार हजार रुपये काढून घेतले आहेत. महागाई वाढल्याने पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न पडत आहे. -रंजना पाटील, गृहिणी, कळंबा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरInflationमहागाई