शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
2
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
3
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
4
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
5
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
6
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
7
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
8
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
9
एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
10
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
11
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
12
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
13
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
14
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
15
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
16
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
17
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
18
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
19
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन, अद्याप ६७ कारखान्यांचे गाळप सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 7:09 AM

देशात ३० एप्रिलअखेर ३२०.३० लाख टन साखरेचे  उत्पादन झाले असून हंगाम अखेरपर्यंत ३२७.३५ लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर  : देशात ३० एप्रिलअखेर ३२०.३० लाख टन साखरेचे  उत्पादन झाले असून हंगाम अखेरपर्यंत ३२७.३५ लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १०५.३० लाख टन साखरेचे  उत्पादन झाले आहे. ५३१ साखर कारखान्यांपैकी ६७ कारखान्यात अजूनही ऊस गाळप सुरू आहे.

उत्तर प्रदेशात १०१.९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून कर्नाटकात ५५.५० लाख टन तर तामिळनाडू व गुजरातमध्ये अनुक्रमे १०.९५ लाख टन व १०.१० लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. याशिवाय हरयाणा (७.१५ लाख टन),पंजाब (६.६५ लाख टन) साखरेचे  उत्पादन झाले असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

देशातील गाळप हंगाम जेमतेम मे महिना अखेरपर्यंत चालेल व त्यातून सुमारे ३२७ लाख टनाचे नवे साखर उत्पादन होईल. या व्यतिरिक्त सुमारे ४५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाईल असा अंदाज आहे.’ 

- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

उताऱ्यात महाराष्ट्र चौथा

देशात सर्वाधिक सरासरी साखर उतारा गुजरातमध्ये  १०.८० टक्के असून त्यानंतर  कर्नाटक आणि तेलंगणात तो १०.१० टक्के,  तर महाराष्ट्रात १० टक्के आहे. यानंतर आंध्र प्रदेश, बिहारमध्ये प्रत्येकी ९.७० टक्के,उत्तर प्रदेशात ९.६५ टक्के या राज्यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने