शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

प्राध्यापकांचा २५ सप्टेंबरपासून काम बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 1:18 AM

कोल्हापूर : रिक्त जागांवर प्राध्यापकांची कायमस्वरूपी भरती व्हावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी आता निर्णायक लढ्याशिवाय पर्याय नाही. या मागण्यांची पूर्तता सरकारने आठवड्याभरात करावी, अन्यथा दि. २५ सप्टेंबरपासून राज्यात प्राध्यापकांचे बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामध्ये शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र फेडरेशन ...

कोल्हापूर : रिक्त जागांवर प्राध्यापकांची कायमस्वरूपी भरती व्हावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी आता निर्णायक लढ्याशिवाय पर्याय नाही. या मागण्यांची पूर्तता सरकारने आठवड्याभरात करावी, अन्यथा दि. २५ सप्टेंबरपासून राज्यात प्राध्यापकांचे बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामध्ये शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनचे (एम्फुक्टो) नेते व माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांनी रविवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)तर्फे आयोजित प्राध्यापकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. विवेकानंद महाविद्यालयातील डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनात झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ‘सुटा’चे अध्यक्ष डॉ. आर. एच. पाटील होते. मागण्यांच्या पूर्ततेसाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला. प्रा. देशमुख म्हणाले, अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्राध्यापकांवर कामाचा ताण वाढत आहे. सरकारकडून चुकीची शैक्षणिक धोरणे राबविली जात आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात कमालीची अस्वस्थता आहे. डॉ. पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रांतून बेमुदत काम बंद आंदोलनात सुमारे तीन हजार प्राध्यापक सहभागी होतील. ‘एम्फुक्टो’चे उपाध्यक्ष डॉ. सुभाष जाधव यांनी प्रास्ताविकामध्ये ‘एम्फुक्टो’च्या नेतृत्वाखाली आपण आतापर्यंत आंदोलनाचे सहा टप्पे पूर्ण केले आहेत. मात्र, सरकारने काहीच लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता तीव्र आंदोलनाची तयारी करूया, असे आवाहन केले. या मेळाव्यास ‘सुटा’चे मार्गदर्शक प्रा. एस. जी. पाटील, सुधाकर मानकर, एस. ए. बोजगर, इला जोगी, टी. व्ही. स्वामी, एन. के. मुल्ला यांच्यासह शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठातील प्राध्यापक उपस्थित होते.‘सुटा’चे प्रमुख कार्यवाह डी. एन. पाटील यांनी स्वागत केले. अरुण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. आर. के. चव्हाण यांनी आभार मानले.ताकद दाखवावी लागेलप्रलंबित मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी संघटितपणे आपली ताकद सरकारला दाखवावी लागेल. या मागण्यांबाबत सरकारला ‘एम्फुक्टो’समवेत चर्चा करायला वेळ मिळत नाही. आपण योग्य वेळी आपल्या ताकदीची सरकारला जाणीव करू देऊ, असे प्रा. देशमुख यांनी सांगितले.