शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा‘ आयटक’चा मेळाव्यात निषेध

By admin | Published: May 29, 2017 4:48 PM

जूनमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चानिर्णय

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २९: देशातील कामगार कायद्यांची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी कामगारांच्यात एकजुटीने करुन सरकारशी मुकाबला करण्यासाठी लढा उभारण्यात येणार असून त्यासाठी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतमजूर व भूमीहिन शेतकऱ्यांना वयाच्या ५५ वर्षानंतर कायद्याची मंजूर झालेली पेन्शन योजना लागू करावी, सरकारचे कामगार विरोधी धोरण मोडीत काढून कामगार कायद्यांची अंमलबजावणी तीव्रतेने करावी, असंघटीत कामगारांना पेन्शन मिळाली पाहिजे आदी मागण्यासाठी सोमवारी दुपारी येथील मुस्लीम बोर्डीगच्या सभागृहात आयटक कामगार केंद्राच्यावतीने कामगार मेळावा झाला.

आयटकच सहसचीव दिलीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात कामगार नेत्यांनी सरकारच्या विवीध धोरणाचा समाचार घेतला. संघटनेचे अध्यक्ष एस.बी. पाटील, मेघा पानसरे आदी प्रमुख उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात दिलीप पवार म्हणाले, सद्याच्या अर्थनितीच्या भस्मासुरामुळे संपूर्ण समाजजीवन उध्दवस्त होत असल्याची टिका केली. ते म्हणाले, कामगार कायद्यांची पायमल्ली करुन हे सरकार कंपन्यामध्ये कंत्राटी कायदा आणून अनेक कामगारांना देशोधडीला लावत आहे. युवकांना नोकरीची प्रलोभने दाखवून सत्तेवर आलेल्या सरकारचे धोरण हे कामगार आणि शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा या सरकारविरोधात कामगार, शेतमजूर असंघटीत कामगारांनी एकसंघ राहून लढा उभारला पाहिजे. त्यासाठी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

मेघा पानसरे म्हणाल्या, देशातील भाजपाचे सरकार हे गरिबांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन श्रीमंतांची काळजी घेत आहे. नोकरदार महिला सुरक्षीत नाहीत. असंघटीत महिला कामगारांनी एकसंघ राहून लढा उभा केला पाहिजे. जात, धर्माच्या नावावर संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत, त्यामुळे एकसंघ राहून सर्वांनी लढ्यातून ताकद दाखवू.

रघुनाथ कांबळे म्हणाले, कामगारानां पेन्शन नाही, देशात दंगली घडवून राजकारण करण्याचे सरकारचे धोरण आहे, त्यामुळे या सरकारच्या धोरणाविरोधात रणशिंग फूंकूया. यावेळी अध्यक्ष एस. बी. पाटील, रघुनाथ देशींगे, विक्रम कदम, बाळासाहेब पोवार, आशा कुकडे, बाबा यादव आदींची भाषणे झाली.

प्रास्ताविक व सुत्रसंचालन महादेव पडवळे व बळवंत पोवार यांनी केले. यावेळी सुशिला यादव, रेखा कांबळे, उमेश पानसरे, जमीर शेख, दीपक निंबाळकर, वाय. के. कांबळे आदी उपस्थित होते. मेळाव्यात, घरेलू कामगार, शेतमजूर महिला लाल साड्या नेसून आपल्या लहान मुलांसहीत मोठ्या संख्येने उपस्थित राहील्या होत्या.