शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

kolhapur: पुरणपोळी खाल्ली; परंतु विजयाचा गोडवा चाखला नाही; आवाडे-माने मनोमिलनाचा अनुभव जुना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 16:57 IST

फडणवीस यांना त्रास नको..

अतुल आंबीइचलकरंजी : पारंपरिक विरोधक असलेल्या माने-आवाडे यांच्यात समेट घडवत वरिष्ठांनी सूत जुळवले. पंधरा वर्षांपूर्वी २००९ च्या निवडणुकीत निवेदिता माने आणि आवाडे यांच्यात असाच समेट घडला होता. त्यावेळी दोघांनी पुरणपोळी खाऊन आम्ही एक झालो, असा संदेश जरूर दिला; परंतु प्रत्यक्षात त्या निवडणुकीत निवेदिता माने यांचा राजू शेट्टींकडून पराभव झाला. माने गटाला विजयाचा गोडवा चाखता आला नाही. या जुन्या आठवणींची इचलकरंजीकरांना मंगळवारी पुन्हा आठवण झाली. निमित्त होते प्रकाश आवाडे यांच्या निवडणुकीतील माघारीचे.गेल्या पाच वर्षांतील दोघांत झालेली धुसफूस पाहता यंदा प्रत्यक्षात मनोमिलन होणार का, याकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. माने आणि आवाडे घराण्यात पारंपरिक राजकीय संघर्ष आहे. त्यात १५ वर्षांपूर्वी सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत निवेदिता माने यांच्याविरोधात राहुल आवाडे यांनी पहिल्यांदाच लोकसभा लढविण्याची घोषणा केली. त्यानिमित्ताने खासदारकीचा मतदारसंघ पिंजून काढत जुन्या गटांना सक्रिय करण्यास सुरुवात केली;परंतु त्यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे यांची काँग्रेसबद्दलची एकनिष्ठता असल्याने वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर राहुल यांना शांत करण्यात आले आणि माने-आवाडे या दोघांच्यात समेट घडविण्यात आला. त्यावेळी गुढीपाडव्यानिमित्ताने आवाडे यांच्या बंगल्यावर पुरणपोळीचे जेवण करून आम्ही एकत्र झालो असल्याचे जाहीर केले. निवेदिता माने यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले; परंतु प्रत्यक्षात तसे फारसे घडले नाही.

या निवडणुकीतही राहुल आवाडे यांनी लोकसभेची तयारी सुरू केली. सुरुवातीला भाजपकडून उमेदवारी मिळेल, या आशेवर जोरदार काम सुरू झाले; परंतु माने यांची उमेदवारी कायम राहिली आणि राहुल यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे त्यांनी उमेदवारीसाठी उद्धवसेनेची चाचपणी केली. त्यातूनही काही होत नसल्याचे पाहून अखेर अपक्षाचा नारा दिला. या बंडाला धार यावी, यासाठी राहुल यांचे नाव बाजूला करत आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव पुढे आणले आणि ताकद दाखवून दिली.

आवाडेंच्या उमेदवारीमुळे धैर्यशील यांना धोका निर्माण होणार, हे जाणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फिल्डिंग लावली. दोन बैठका आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून फोन करून आवाडेंचे बंड थंड केले. त्यानंतर इचलकरंजी मतदारसंघात सर्व जुन्या चर्चांना नव्याने सुरुवात झाली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दोघांतील मनोमिलन खासदार माने यांना विजयापर्यंत कसे नेते, याकडे लक्ष लागले आहे.

फडणवीस यांना त्रास नको..आवाडेंच्या बंडखोरीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव येत असल्याने त्यांची अडचण होऊ नये, यासाठी माघार घेतल्याचे आवाडे गोटातून सांगण्यात आले.

संघर्ष कशामुळे?इचलकरंजीतील कृष्णा पाणीपुरवठा योजनेची पाच किलोमीटरची पाइपलाइन बदलणे, सहा जलकुंभांची उभारणी, शंभर कोटींचे रस्ते अशा कामांमध्ये माने यांच्याकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप आमदार आवाडे यांनी नाव न घेता केला होता. त्यातून दोघांतील संघर्ष वाढला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणPrakash Awadeप्रकाश आवाडेdhairyasheel maneधैर्यशील माने