शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

‘पाणीबाणी’वर हवी नियोजनाची ‘मात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2016 11:07 PM

इचलकरंजी शहराला धग : ‘कृष्णा’ऐवजी ‘वारणे’वर अवलंबून राहावे लागणार

इचलकरंजी : उन्हाळ्याच्या वाढलेल्या झळांबरोबरच इचलकरंजीकरांना पाणी टंचाईची धग लागत आहे. कोयना धरणातील साठा शासनाने आणीबाणीसाठी आरक्षित ठेवला आहे. इचलकरंजीसह कृष्णा काठावरील दोन्ही बाजूंच्या जनतेला आता वारणा धरणातील पाणी साठ्यावर अवलंबून राहावे लागणार असल्याचे ‘सत्य’ उघड झाले आहे. त्यामुळे साडेतीन लाख इचलकरंजीवासीयांसाठी येत्या तीन महिन्यांसाठी योग्य नियोजन आणि त्याच्या काटेकोर अंमलबजावणीची गरज निर्माण झाली आहे.जानेवारीपासून पाणी प्रदूषणामुळे पंचगंगेतील पाण्याचा उपसा बंद करावा लागतो. त्यामुळे कृष्णा नदीतील पाण्याशिवाय अन्य उपाय राहात नाही. अशी वस्तुस्थिती असताना इचलकरंजीत गेले आठवडाभर झालेल्या पाणी-बाणीच्या काळात नगरपालिकेसमोर कोणतेही नियोजन नव्हते, ही बाब उघडकीस आली. पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ, नगरसेवक विठ्ठल चोपडे, जलअभियंता ए. एन. जकीनकर यांनी धावपळ केल्याने वास्तव समजले.सुरूवातीला चार-पाच दिवस आमदार सुरेश हाळवणकर यांच्यामार्फत झोळ, चोपडे, जकीनकर आणि मुख्याधिकारी यांनी पाटबंधारे खात्यास जाग आणण्याचा प्रयत्न केला. चांदोली (वारणा) धरणातून सोडलेले पाणी इचलकरंजीसाठी मजरेवाडी (ता. शिरोळ) येथे पोहोचू द्या, म्हणून दूरध्वनी केले. मात्र, पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना फक्त झुलवत ठेवले. अखेर आमदार हाळवणकर यांनी जिल्हाधिकारी अमित सैनी यांना पाणी टंचाईची कल्पना दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनाही सांगण्यात आले आणि पाटबंधारे खात्याची चक्रे हालली.म्हैशाळ बंधाऱ्यात अडविलेले पाणी १२०० क्युसेकप्रमाणे उत्सर्ग करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून मंगळवारी रात्री राजापूर बंधाऱ्यात पर्यायाने मजरेवाडी येथे पाण्याचा साठा झाला आणि बुधवारपासून इचलकरंजीत अंशत: का होईना, नळ पाणीपुरवठा सुरू झाला. गेल्या आठवडाभराच्या पाणी टंचाईच्या काळात स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था आणि त्यांचे दुर्लक्ष, काहींनी टॅँकर भागात नेण्यासाठी केलेली अरेरावी, कूपनलिकांतील पाण्याची परिस्थिती अशा सर्व गोष्टी आता लक्षात आल्या असून, प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी त्यापासून बोध घ्यावा आणि येत्या तीन महिन्यांतील पाणी टंचाईवर मात करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)