शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोल्हापुरात पुन्हा पावसाच्या सरी बरसल्या; पुढील चार दिवस पाऊस, बळीराजा सुखावला 

By भीमगोंड देसाई | Updated: August 16, 2023 19:32 IST

माळरानावरील ज्वारी, भुईमूग, सोयाबीन अशी पिके वाळत होती

कोल्हापूर : शहर, परिसर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी बुधवारी दुपारनंतर पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. आठ दिवसांहून अधिक काळ गायब झालेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. हवेत गारवा निर्माण झाला. शहरातील सखल भागातील रस्त्यावर पाणी तुंबून राहिले.तब्बल आठवड्याहून अधिक दिवस पावसाने पाठ फिरवली होती. यामुळे नदी, ओढ्यातील पाणी कमी झाले. माळरानावरील ज्वारी, भुईमूग, सोयाबीन अशी पिके वाळत होती. पाऊस नसल्याने सर्वच पिकांची वाढ खुंटली होती. गडहिंग्लज, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यात इतर ठिकाणी दुपारच्यावेळी उन्हाळ्यासारखे ऊन पडत होते. हवेत कमालीची उष्णता वाढली होती. अंगाची लाहीलाही होत होती. यामुळे शेतकऱ्यांसह साऱ्यांनाच पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती.आकाशात ढग जमत होते. पण पाऊस कोसळत नव्हता. बुधवारी पहाटेपासून आकाशात ढगांची गर्दी राहिली. सकाळी साडेदहाच्या सुमारास कागल, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड तालुक्यातील काही भागात हलका पाऊस झाला. शहरात आणि परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने पादचारी, दुचाकी, फेरीवाले, विक्रेत्यांची तारांबळ उडाली. अर्धा तास जोरदार पाऊस पडला. त्यानंतर काही प्रमाणात पाऊस कमी झाला. मात्र अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या.२२ पर्यंत पाऊस२० ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस होईल. त्यानंतर २१ आणि २२ ऑगस्टपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी