शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
2
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
3
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
4
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
5
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
6
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
7
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
8
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
9
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
10
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
11
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
12
श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईची मुंबईत नवीन खरेदी; अपार्टमेंटची किंमत ऐकून बसेल धक्का
13
१० व्या मिनिटाला आयफोन १६! टाटांनी डाव टाकला; फ्लिपकार्टची तंतरली, थेट फॅक्टरीतून? 
14
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
15
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
16
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
17
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
18
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
19
धक्कादायक! ॲमेझॉन जंगलात अंदाधुंद वृक्षतोड; दोन देशांच्या क्षेत्रफळाइतके जंगल साफ...
20
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव

पावसाला ताकद लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:49 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू झाली, मात्र त्यानंतर उघडीप दिली. पावसाळाचे वातावरण तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू झाली, मात्र त्यानंतर उघडीप दिली. पावसाळाचे वातावरण तयार झाले असले तरी त्याला ताकद लागत नाही. सध्या खरीप पिकांना जोरदार पावसाची गरज आहे.

मंगळवारपासून महाराष्ट्रात जाेरदार पाऊस काेसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे गेली दोन दिवस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा वरुणराजाकडे लागल्या होत्या. सोमवारपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल होत गेला. मंगळवारी सकाळी अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कोल्हापूर शहरात सकाळी अकरा वाजता पावसाची रिपरिप सुरू झाली, साधारणत: तासभर पाऊस राहिला. त्यानंतर ढगाळ वातावरण होते, हवेत मात्र गारवा जाणवत होता. तापमानातही घट होऊन कमाल तापमान २६ डिग्रीपर्यंत खाली आले होते. आज, बुधवारपासून जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महावितरणला अजून चिखलाचीच भीती

पंधरा ते वीस दिवस पाऊस नसल्याने पिके वाळू लागली आहेत. विहीर, नदीत पाणी असताना विद्युतपंपाला वीज नसल्याने पाणी उपसता येत नाही. नदीकाठचे खांब महापुरामुळे वाकले आहेत, त्याची दुरुस्ती झालेली नाही. शेतकरी महावितरणच्या कार्यालयात खेटे मारून वैतागले आहेत. नदीकाठी अजून चिखल असल्याने त्यातून काम करायचे कसे, असे उत्तर महावितरणचे अधिकारी देत आहेत.