शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी पुन्हा रुग्णालयात, आठवडाभरात दुसऱ्यांदा झाले दाखल
2
"आदिवासी नेत्याला CM पदावरून हटवणे अत्यंत दु:खद", हिमंता बिस्वा सरमा यांचा जेएमएम-काँग्रेसवर निशाणा
3
"मी आधीच निघून गेलो होतो, समाजकंटकांनी..."! हाथरस दुर्घटनेवर भोले बाबा यांची पहिली प्रतिक्रिया
4
18 राज्‍यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात डंका, यांच्याकडून मिळतो तब्बल 90 टक्के पैसा!
5
राहुल द्रविडने नेमकं काय केलं? फक्त ‘त्या’ एका गोष्टीला ‘हरवलं’ अन् टीम इंडियानं जग जिंकलं.. 
6
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे
7
जो बायडेन यांचा पत्ता कट? मिशेल ओबामा लढवणार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
8
झारखंडमध्ये नेतृत्वबदल, चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM  
9
"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका
10
“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे
11
कोल्हापूर : वर्दी परिधान करण्याअगोदरच मृत्यू; २६ वर्षीय तरूणाची चटका लावणारी एक्झिट
12
“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
13
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
14
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं
15
Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?
16
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 
17
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
18
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
19
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
20
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान

पावसाची दडी; खरिपाने मान टाकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:26 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वरुणराजाने गेले आठ-दहा दिवस दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकल्या असून, जिल्ह्यातील सुमारे ३० हजार हेक्टरवरील भात, भुईमूग व नागलीची पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. ‘आज पाऊस येईल, उद्या येईल,’ या आशेवर शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वरुणराजाने गेले आठ-दहा दिवस दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकल्या असून, जिल्ह्यातील सुमारे ३० हजार हेक्टरवरील भात, भुईमूग व नागलीची पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. ‘आज पाऊस येईल, उद्या येईल,’ या आशेवर शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले असून, वरुणराजा हुलकावणी देत असल्याने चिंंता वाढली आहे.यंदा मान्सूनने वेळेत व चांगली सुरुवात केल्याने खरीप पिकांची उगवण चांगली राहिली. जूनमध्ये पावसाला ताकद लागली नसली तरी जुलै महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. जुलैअखेर वार्षिक सरासरीच्या ४४ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे पिकांची वाढ जोमात झाली. उर्वरित दोन-अडीच महिन्यांत चांगला पाऊस होईल, असे अपेक्षित होते. आॅगस्ट उजाडला आणि पावसाने दडी मारली. पहिले दोन-तीन दिवस अधूनमधून का असेना पण सरी कोसळत होत्या; पण गेले आठ-दहा दिवस पावसाने अक्षरश: पाठ फिरविल्याने पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील भात, नागली व भुईमूग ही पिके करपू लागल्याने शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. गेले दोन महिने मशागत व महागडी खते घालून पोटच्या पोरासारखे सांभाळलेली पिके डोळ्यांदेखत करपू लागली आहेत.आज पाऊस येईल, उद्या येईल, या आशेवर शेतकरी आहे. दिवसभर आकाशात ढग गोळा होतात; पण पाऊस हुलकावणी देत असल्याने चिंता वाढली आहे. हाता-तोंडाला आलेल्या पिकांनी पाण्याअभावी माना टाकण्यास सुरुवात केली आहे.नदी, विहिरीत पाणी; पण वीज गायबपावसाळ्यात साधारणपणे सप्टेंबरपर्यंत नदी व विहिरीवरील विद्युत पंपांचा वीजपुरवठा बंद असतो. सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापासून पाऊस ओढ धरत असल्याने त्यानंतरच पिकांना पाण्याची गरज भासते; पण यंदा परिस्थिती थोडी वेगळी आहे. नदी, विहिरीत पाणी आहे; पण काही ठिकाणी वीज नसल्याने पिके करपू लागली आहेत.दोन वर्षांपूर्वीची आठवण!दोन वर्षांपूर्वी पावसाने अशीच हुलकावणी दिली होती. जोमात वाढ होण्याच्या वेळेलाच पाऊस गायब झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासारखा अनुभव यंदा शेतकºयांना येऊ लागला आहे.पोषक हवामानामुळे किडींचे आक्रमणकिडीला पोषक असेच हवामान असल्याने सर्व पिकांवर विविध कीडरोगांनी आक्रमण सुरू केले आहे. सोयाबीनवर पाने खाणारी अळी, भाजीपाला व भुईमुगावर पांढºया माशी व फुलकिडीचा प्रादुर्भाव, तर भातावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसत आहे.‘आॅक्टोबर हिट’चा अनुभवपावसाने दडी मारलीच, पण तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत असल्याने अंग करपू लागते. रविवारी दिवसभर सरासरी २८ अंश सेल्सिअस तापमान राहिले. उद्या, मंगळवारी ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याचा आहे.तुलनात्मक पाऊस (मि.मी.), कंसात टक्केतालुका १३ आॅगस्ट २०१६ १३ आॅगस्ट २०१७हातकणंगले ४८१ (५९) २२७ (२७)शिरोळ ४५५ (११८) १४९ (३८)पन्हाळा १४६२ (१०३) ८३० (५८)शाहूवाडी १९१९ (१२४) १२३० (७९)राधानगरी १५०१ (४२) ११४१ (३२)गगनबावडा ३१७०(५६) २१११ (३७)करवीर ८६१ (१०८) ४०८(५१)कागल ९८३ (१५१) ५२० (८०)गडहिंग्लज ६८६(८७) ३३७ (४३)भुदरगड ११२६ (८३) ७९४ (५९)आजरा १५०३ (८४) ९४५ (५२)चंदगड १४८१ (५६) ११७७ (४५)एकूण १३०२ (७३) ८२२ (४६)