शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर पकडला, राधानगरी, वारणा धरणातून विसर्ग सुरुच

By राजाराम लोंढे | Published: August 02, 2024 4:49 PM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे, त्यात दिवसभरातील पाऊस पाहता कोल्हापूरकरांची पुन्हा धाकधूक वाढली आहे.हवामान विभागाने गुरुवार व शुक्रवार दोन दिवस कोल्हापूरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. त्यानुसार पाऊस सुरू असून गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी जोर अधिक आहे. जोरदार सरी कोसळत असल्याने सगळीकडे पुन्हा पाणी पाणी झाले आहे. पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले होते, मात्र पावसाचा जोर वाढल्याने ते पुन्हा वाढू लागले आहे.धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ५७८४, वारणातून ११५५२ तर दुधगंगेतून ९१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराच्या पाण्याची फुग वाढू लागली आहे. पंचगंगा नदीची पुन्हा धोक्याकडे वाटचाल सुरू असल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे. दुपारी एक नंतर पुराचे पाणी हळूहळू वाढू लागले आहे.दरम्यान, शनिवारपासून दोन दिवस जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला असला तरी सध्याचा जोर पाहता पाऊस अडचणी वाढवण्याची शक्यता आहे.

पडझड काही थांबेनायंदा पावसाबरोबर मालमत्तांची पडझड थांबण्याचे नाव घेईना. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात १४३ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ५१ लाख ७१ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

चार तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली

हातकणंगले, शाहूवाडी, कागल व भुदरगड तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. शिरोळ, पन्हाळा, करवीर, गडहिंग्लज तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरRainपाऊस