शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

कोल्हापुरात पावसाचे पुनरागमन, पण जोर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:17 AM

कोल्हापूर : रिमझिम का असेना पण पावसाने शुक्रवारी कोल्हापुरात पुनरागमन केले आहे. तब्बल पंधरा दिवसांच्या दडीनंतर आलेल्या या ...

कोल्हापूर : रिमझिम का असेना पण पावसाने शुक्रवारी कोल्हापुरात पुनरागमन केले आहे. तब्बल पंधरा दिवसांच्या दडीनंतर आलेल्या या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी आनंदला आहे. गगनबावड्यात सर्वाधिक १६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

कोल्हापुरात संपूर्ण मे महिन्यात वळवाने आणि त्यापाठाेपाठ वेळेत आलेल्या मान्सूनने जोरदार सलामी दिल्याने पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात पुराची परिस्थिती निर्माण झाली. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून मात्र पावसाने उघडीप घेतली. तेव्हापासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती. पावसाऐवजी कडकडीत ऊन पडत असल्याने पिकांची होरपळ वाढली होती.

गुरुवारपासून पाऊस सुरु होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, पण गुरुवारी पावसाने हुलकावणी दिली, दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने कांहीसा दिलासा मिळाला. मध्यरात्रीपासून मात्र पावसाचे आगमन झाले. सकाळी सातपर्यंत पाऊस कोसळत राहिला. त्यात फारसा जोर नसलातरी होरपळणारी पिके जगवण्यापुरता पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला. शुक्रवारी दिवसभर असेच ढगाळ वातावरण राहिले. बारा वाजण्यास सुमारास हलक्याशा सरी कोसळू लागल्या. त्यानंतर दुपारी उघडीप दिली. परत संध्याकाळी पाचनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दरम्यान कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होत असल्याने पुढील चार दिवस जोरदार पावसाचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शेतकऱ्यांची चिंता मिटली

जिल्ह्यात सर्वत्र पावसाने आगमन केल्याने शेतकरी आनंदला आहे. गेल्या महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून पिकेही चांगली तरारली आहेत. आंतरमशागतीची कामेही पूर्ण झाली आहेत. पण ऐन वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने पीक वाळण्याचे व दुबार पेरणीचे संकट घोंगावत होते. आता पाऊस सुरु झाल्याने ही चिंता पूर्णपणे मिटली आहे.

रोप लागणीला वेग येणार

भात, नाचणीची रोपे तयार आहेत, पण पाऊसच नसल्याने लागणी खोळंबल्या होत्या. आता पाऊस परतल्याने आणि पुढील आठवडाभर दमदार बरसणार असल्याने रोप लागणीच्या कामाला वेग येणार आहे.