शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

किटवडे भागात पावसाची ओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:16 AM

आजरा : आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात चालू वर्षी १६ ते १९ जून दरम्यान २० वर्षांतील उच्चांकी पाऊस, ...

आजरा : आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात चालू वर्षी १६ ते १९ जून दरम्यान २० वर्षांतील उच्चांकी पाऊस, तर २४ जून ते ३ जुलै दरम्यान फक्त ४४ मि.मी. नीचांकी पाऊस झाला. पावसाअभावी रोप लावणीसह पेरणी केलेल्या जमिनीला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे.

कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले किटवडे हे गाव आहे. आंबोलीच्या डोंगर माथ्यावरील पडणाऱ्या पावसापेक्षा आजरा तालुक्यातील किटवडे येथे जास्त पाऊस पडतो. पावसाचे माहेरघर अशी महाराष्ट्र व राज्याच्या पाऊस खात्यामध्ये किटवडेची नोंद आहे.

प्रतिवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत दररोज १५० ते २०० मि.मी. पाऊस या ठिकाणी पडतो. याच पावसाने आजरा तालुक्यातील एरंडोळ, धनगरवाडी धरणे भरली, तर चित्रीमध्ये ६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. मुसळधार पावसानंतर सर्वत्र भातरोप लावणी केली जाते. मात्र, सध्या हत्ती, गवे यासह जंगली जनावरांचा असणारा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या दहा दिवसांपासून या परिसरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे भात रोप लावणीची कामे खोळंबली आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी मोटारीने पाणी पाजून भात रोप लावणी करण्यास सुरुवात केली आहे. पावसाचा लहरीपणा, चालूवर्षी शेतकऱ्यांना धोक्याची घंटा देऊन जात आहे.

दहा दिवसांतील पाऊस असा २४ जून - १० मि.मी. २५ जून - ११ मि.मी. २६ जून- १.५० मि.मी.

२७, २८, २९ जून - निरंक ३० जून - २.५० मि.मी.

१ जुलै - १० मि.मी.

२ जुलै - ११ मि.मी.

३ जुलै - १० मि.मी.

१ मे ते ३ जुलैअखेर - २०३२ मि.मी. -------------------------

पावसाअभावी जमिनीला भेगा

आजरा तालुक्यात सर्व पिकांची पेरणी पूर्ण, तर रोप लावणी ७० टक्के क्षेत्रावर पूर्ण झाली आहे. पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्याने कोळपणी व बाळ भांगलणी पूर्ण झाली. मात्र, गेल्या १० ते १२ दिवसांपासून पाऊस रुसल्याने जमिनीला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे.