शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

मानसिंगरावांचे वर्चस्व राष्ट्रवादीचे बळ वाढवणारे

By admin | Published: May 28, 2017 1:31 AM

शिराळा नगरपंचायतीवर सत्ता : जिल्हा परिषद, पंचायत समितीपाठोपाठ लक्षणीय विजय

विकास शहा ।  लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : शिराळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला, तर भाजपने सहा जागा जिंकून नगरपंचायतीत प्रवेश केला. मात्र कॉँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती, जिल्हा परिषदेपाठोपाठ नगरपंचायतीवरील वर्चस्व राष्ट्रवादीचे बळ वाढवणारे आहे. नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदी कोण यासाठी आता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.७५ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या ग्रामपंचायतीचे १३ मार्च २०१६ रोजी नगरपंचायतीत रूपांतर झाले. त्यावेळी याठिकाणी राष्ट्रवादी व कॉँग्रेसची आघाडी होती. नगरपंचायत स्थापन झाली आणि काही महिन्याच्या अंतरावर नागपंचमी आली. यामुळे सर्व नागरिक, नागमंडळे, सर्व पक्षांनी जिवंत नागपूजेस जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला. कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने निवडणूक आयोगाला ही निवडणूक स्थगित करावी लागली. यानंतर काही महिन्यातच राजकीय घडामोडीत पक्षांतील मतभेद नागपंचमी बचाव कृती समितीत आले. ३१ डिसेंबरच्या मुख्यमंत्री दौऱ्यावेळी शिराळा बंद, बंदबाबत निवेदन यावरून तणाव निर्माण झाला. एवढेच नव्हे, तर २२ जणांना एक रात्र तुरुंगात घालवावी लागली. यामुळे निवडणूक बहिष्काराबाबत मतभेद होऊ लागले.नागपंचमीबाबत कोणी काय केले, याबाबत टीकाटिपणी सभेत होऊ लागली. ही टीका वैयक्तिक जीवनावर, खालच्या पातळीपर्यंत पोहोचली. याचाच परिणाम काही पक्षांनी पहिल्यांदा आॅनलाईन अर्ज भरला, तर कोणी ए फॉर्म दिला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी दोन तासात १४१ अर्ज दाखल झाले. यामुळे बहिष्कार मागे पडून लोकशही मार्गाने आता नागपंचमीचा प्रश्न सोडविण्याचा विचार पुढे आला.कॉँग्रेस आघाडी झाली नाही, मात्र भाजप-महाडिक युवा शक्ती यांची युती झाली आणि प्रचार सुरू झाला. पुन्हा प्रचारात भ्रष्टाचार, वैयक्तिक पातळीपर्यंत आरोप-प्रत्यारोप, विकासकामे, नागपंचमी हे विषय आले. पत्रके वाटली गेली, यामुळे ही निवडणूक कॉँग्रेस -राष्ट्रवादी- भाजप यांच्या अस्तित्वाची ठरली आणि सर्वजण लढाईसाठी रिंगणात आले. डिजिटल, टीव्हीद्वारे हायटेक प्रचार यंत्रणा वापरण्यात आली.भाजपने मंत्री सदाभाऊ खोत, सौ. नीता केळकर यांच्या सभा घेतल्या, तर माजी आमदार मानसिंगराव नाईक, कॉँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या प्रमुख सभा झाल्या. अगदी शेवटपर्यंत मोठी चुरस चालू होती. याचमुळे विक्रमी असे ८७.५१ टक्के मतदान केले. हे विक्रमी मतदान कोणाला तारणार नी कोणाला मारणार याकडे सर्वांचे लक्ष होते.अखेर राष्ट्रवादीने १७ पैकी ११ जणांवर यश मिळविले, तर भाजपने ६ जागा मिळविल्या, मात्र कॉँग्रेसला एकही जागा मिळविता आली नाही. तसेच मतांचा विचार करता त्यातही त्यांना अपयश आले. राष्ट्रवादीमार्फत विराज नाईक, अ‍ॅड. भगतसिंग नाईक, सौ. सुनीता नाईक, भाजपचे रणधीर नाईक, रणजितसिंह नाईक, सुखदेव पाटील, तर कॉँग्रेसमार्फत महादेव कदम, प्रतापराव यादव, तर महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक, केदार नलवडे यांनी प्रचार यंत्रणेत आघाडी घेतली होती.पहिल्या नगराध्यक्षांकडे लक्षराष्ट्रवादीची सत्ता नगरपंचायतीवर आली आहे. त्याचबरोबर या नगरपंचायतीमुळे प्रामुख्याने कार्यालय इमारत, घनकचरा व्यवस्था, शहरात स्वच्छतागृह उभारावे, तोरणा ओढा स्वच्छता याचबरोबर प्रामुख्याने नगरपंचायतीस गतवैभव मिळवून देण्यासाठी मोठा प्रयत्न करावा लागणार आहे. भाजपनेही याबाबत सत्ताधारी राष्ट्रवादीबरोबर विकास कामे आणि नागपंचमीबाबत सहकार्य धोरण जाहीर केले आहे. आता मिशन नगराध्यक्षपद यासाठी अर्चना शेटे, सुनंदा सोनटक्के आणि सुजाता इंगवले यापैकी कोण होणार पहिल्या नगराध्यक्षा याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.