शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज ठाकरे शिवद्रोही, नाक घासून माफी मागावी, श्रीमंत कोकाटे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 11:17 IST

मृत्यूनंतर वैर संपले असे म्हटले जाते. वैर संपते; पण विकृती संपते का? वैर तर पुरंदरेंनीच धरले. आमच्या अस्मितांची निंदानालस्ती केली. त्याविरुध्द आम्ही लढलो. लढत आहोत. लढत राहू.

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचे उदात्तीकरण करणारे राज ठाकरे हे शिवद्रोही असून त्यांनी छत्रपतींच्या पुतळ्यासमाेर नाक घासून माफी मागावी, अशी मागणी इतिहास संशोधक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याच्या कटात राज ठाकरे सहभागी आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

मृत्यूनंतर वैर संपले असे म्हटले जाते. वैर संपते; पण विकृती संपते का? वैर तर पुरंदरेंनीच धरले. आमच्या अस्मितांची निंदानालस्ती केली. त्याविरुध्द आम्ही लढलो. लढत आहोत. लढत राहू. सांस्कृतिक स्वातंत्र्यासाठी लढणे वैर नाही किंवा कोणाचा द्वेष करणे नाही. मृत्यूनंतरही विकृती कायम रहात असेल तर त्या विकृतीला विरोध करायलाच हवा. अन्यथा त्याचे दुष्परिणाम पुढच्या पिढ्यांवर होतात. पुरंदरे विकृतीचे परिपाक आहेत. जेम्स लेनचा खरा ब्रेन तेच होते. अशा पुरंदरेंचे राज ठाकरे नेहमी उदात्तीकरण करतात हेच आक्षेपार्ह आहे, असे कोकाटे म्हणाले.

शिवाजी महाराजांचा महाराणी सईबाई यांच्यासोबत विवाह विजापूर मुक्कामी झाला होता. या विवाहाला भोसले निंबाळकर परिवारातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. खुद्द आदिलशहाने विवाहसमारंभाला येऊन शुभेच्छा दिल्याचा पुरावा निंबाळकर दप्तरात सापडतो. तरी देखील पुरंदरेंनी जाणीवपूर्वक शहाजीराजांना गैरहजर दाखवण्यासाठी त्यांनी ते लग्न पुणे मुक्कामी झाले असे दाखवले, असे कोकाटे यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब पाटील, विजय पाटील, अमोल चव्हाण, राम पोवार उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaj Thackerayराज ठाकरे