शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

राजाभाऊंच्या भेळने गाठली पन्नाशी...

By admin | Published: December 06, 2015 1:10 AM

खवय्यांची प्रथम पसंती : कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग

मुरलीधर कुलकर्णी / कोल्हापूर इथल्या खवय्यांची प्रथम पसंती असलेली खाऊ गल्लीत मिळणारी राजाभाऊंची भेळ कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीचा जणू अविभाज्य भाग बनली आहे. ५ डिसेंबर १९६५ रोजी स्वर्गीय राजाभाऊंनी सुरू केलेली ही भेळ आज अर्धशतकाची झाली आहे. साधारण १९६0-६२च्या सुमारास सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील ढवळी या छोट्याशा खेड्यातून राजाभाऊ शिंदे नावाचा पंचवीसीतला एक तरुण कामाच्या शोधात कोल्हापुरात आला. पोटापाण्यासाठी काय करावे या विवंचनेत असलेल्या त्या तरुणाने सुरुवातीचे काही दिवस अनेक छोटी, मोठी कामे केली; पण कशातच जम बसेना. शेवटी एक दिवस त्याच्या डोक्यात एक कल्पना आली अन् लगेच तो कामाला लागला. सायकलवरून फिरून कोल्हापूरच्या गल्लीबोळांतून भडंग विकण्याचा व्यवसाय त्यानं सुरू केला. या भडंगाच्या चवीचंलोकांना जणू वेडच लागलं. लोक त्याच्या येण्याची वाट पाहू लागले. थोडं अर्थार्जन झाल्यावर त्यानं भवानी मंडपाच्या कमानीजवळ एका छोट्याशा हातगाडीवर आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. भडंगाबरोबरच कांदा, कोथिंबीर, गोड चिंचेचं पाणी, शेव आणि चिवडा घातलेला भेळ नावाचा एक नवाच पदार्थ त्यानं कोल्हापूरकरांपुढं सादर केला अन् बघता-बघता कोल्हापूरकरांना त्याच्या या भेळेनं अक्षरश: वेड लावलं. या पदार्थाची लोकप्रियता पाहून शहरात पुढे अनेकांनी भेळेच्या गाड्या सुरू केल्या; पण मोठ्या मनाच्या राजाभाऊंनी कधीच कुणाला अटकाव केला नाही. आज त्यांची ही ‘आॅल इंडिया स्पेशल भेळ’ पन्नास वर्षांची यशस्वी वाटचाल संपवून ५१व्या वर्षांत पदार्पण करतेय. त्यांची दोन मुले रवींद्र आणि अरविंद आज व्यवसाय सांभाळत आहेत. पन्नास वर्षांपूर्वी तुटपुंज्या भांडवलावर सुरू केलेल्या त्यांच्या व्यवसायात आज लाखोंची उलाढाल होतेय; पण हे सगळं पाहायला आज राजाभाऊ मात्र आपल्यात नाहीत, याचंच त्यांच्या परिवारासह कोल्हापूरच्या खवय्यांनाही दु:ख होतंय.