शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

राजाराम कारखाना निवडणूक: वाढलेल्या टक्केवारीने वाढली निकालाची हुरहुर, दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 12:49 PM

या निवडणुकीत यंत्रणा राबवण्यापासून, जेवणावळी व प्रत्यक्ष रोख रकमेचे वाटप याचा विचार केला असता तेवढ्या रकमेतून नवा कारखाना उभा राहिला असता, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ सभासदाने व्यक्त केली

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विक्रमी ९१.१२ टक्के मतदान झाल्याने निकालाबद्दलची हुरहुर कमालीची वाढली आहे. गत निवडणुकीत सरासरी नव्वद टक्के मतदान झाले होते. दोन्ही बाजूंकडून सर्रास झालेले पैशाचे वाटप, प्रत्येक मतदार बाहेर काढण्यासाठी लागलेली यंत्रणा, प्रचारात उठलेली राळ आणि बोगस मतदान रोखण्यात आलेले यश यामुळे निवडणुकीत कमालीची चुरस दिसली. सभासदांच्या मतांचा कौल मात्र मंगळवारीच स्पष्ट होईल.ही निवडणूक गेली वर्षभरापासून गाजते आहे. सुरुवातीला ती अपात्र सभासदांच्या लढ्यामुळे गाजली. त्याची लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. त्यानंतर विरोधी आघाडीचे तगडे उमेदवार अपात्र ठरण्यावरून गाजली. ती लढाईही उच्च न्यायालयापर्यंत गेली. या दोन्ही लढ्यांत सत्ताधारी महादेवराव महाडिक यांच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे आता प्रत्यक्ष मतपेटीतील लढाई कुणाच्या बाजूने कौल देते याबद्दल अंदाज वर्तवणे मुश्कील झाले आहे.राजाराम कारखान्याची सत्ता ही महाडिक गटाकडे राहिलेली जिल्हा पातळीवरील एकमेव व महत्त्वाची सत्ता आहे. विधान परिषद, विधानसभा, गोकुळ आणि लोकसभेला पाठोपाठ पराभव झाल्यानंतर महाडिक गट जिल्ह्याच्या राजकारणात बॅकफुटवर गेला; परंतु राज्यसभेला आकस्मिकपणे धनंजय महाडिक यांना भाजपने संधी मिळाली व पुन्हा या गटाला उभारी आली.पुढे राज्यात सत्तांतर झाल्याचा फायदाही राजारामच्या निवडणुकीत सभासद व उमेदवार अपात्र प्रकरणात सत्तारूढ गटाला झाला. त्यांच्या दृष्टीने राजारामची सत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांनीही सर्व पातळ्यांवर उतरून ही निवडणूक लढवली. बऱ्याचदा लोक कारखान्याची सत्ता व विधानसभा किंवा अन्य निवडणुकीतील यश याची फारच चौकसपणे निवड करतात. गेल्या २८ वर्षांत महाडिक यांचा दबदबा राहिला. त्यामुळे त्यांच्याशी जोडलेले लोक कितपत बाजूला जातात यावरच गुलाल ठरणार आहे.निवडणूक कोणतेही असो, ती सतेज पाटील यांनी एकदा अंगावर घेतली की मग मागेपुढे पाहायचे नाही. तिला भिडायचे याचा अनुभव लोकसभा व गोकुळच्या निवडणुकीतही आला होता. तशीच यंत्रणा त्यांनी या निवडणुकीत राबवली. को-जन, डिस्टलरी प्रकल्प, विस्तारीकरण, उसाला दर, कारखान्याचे बकालपण, सभासदांना मिळणारी वागणूक हे मुद्दे निवडणुकीत ऐरणीवर आणून त्यांनी मतदारांच्या भावनेला हात घातला.तगडे उमेदवार अपात्र ठरल्याने या निवडणुकीत त्यांच्या पॅनलमध्ये गावपातळीवरील सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली. वाशीसारख्या एकाच गावांत तीन उमेदवार द्यावे लागले. त्यामुळे गावे व तगडे उमेदवार यांचा समतोल साधता आला नाही हे खरे असले तरी त्यांनी सतेज पाटील हेच उमेदवार आहेत, असे वातावरण निर्माण करण्यात यश मिळवले. त्यांची व्यक्तिगत राबणूक हीच लढतीत हवा निर्माण करणारी ठरली. मयत मतदान होणार नाही याची दक्षता घेतली. हातकणंगले तालुक्यात विनय कोरे यांनी एका सभेत भाषण केले; परंतु ते सक्रिय होणार नाहीत याची व्यवस्था केली. सर्जेराव माने यांचे बळ, गोकुळची सत्ता सोबत होती. अशा अनेक जोडण्या लावल्याने त्यांना विजयाचा पुरता आत्मविश्वास आहे.

नवा कारखाना झाला असता...

या निवडणुकीत यंत्रणा राबवण्यापासून, जेवणावळी व प्रत्यक्ष रोख रकमेचे वाटप याचा विचार केला असता तेवढ्या रकमेतून नवा कारखाना उभा राहिला असता, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ सभासदाने व्यक्त केली. अगोदर एका गटाने पाच हजार दिले, ते दुसऱ्या गटाला समजल्यावर त्यांनी दहा दिले. मग पहिल्या गटाने आणखी दहा हजार मताला दिले असे अनेक गावांत घडले. मतदारांनी दोघांकडून पैसे घेतले आहेत. त्यामुळे पैशाचा प्रभाव पडतो की, लोक कारभार पाहून जागरूकतेने मतदान करतात यावरही निकाल ठरेल. कुंभी-कासारी, राजाराममध्ये जे घडले ते ऐकून निवडणूक होणाऱ्या बिद्री, भोगावतीसारख्या इतर कारखानदारांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकAmal Mahadikअमल महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील