शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
2
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
3
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
4
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
5
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
6
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
7
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
8
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
9
सणासुदीच्या काळात ₹10000 कोटी रुपयांची खरेदी करण्याच्या तयारीत गौतम अदानी? या बड्या कंपनीवर नजर?
10
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
11
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का
12
हृदयद्रावक! वडिलांबरोबर पोहायला गेलेला, नऊ वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाला
13
"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
14
गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास
15
कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण
16
रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्...
17
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
18
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा यांची तब्येत बिघडली, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
19
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."
20
Prajakta Mali : "तुझ्यातला प्रामाणिकपणा, जिद्द..."; प्राजक्ता माळीने केलं सूरज चव्हाणचं झापुक झुपूक अभिनंदन

राजाराम कारखान्याच्या विस्तारीकरणासह वीज निर्मिती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:23 AM

कोल्हापूर : छत्रपती राजाराम साखर कारखान्याची गाळपक्षमता साडेतीन हजार मे. टन प्रतिदिनवरून पाच हजार करण्यात येणार असून, सहवीज निर्मिती ...

कोल्हापूर : छत्रपती राजाराम साखर कारखान्याची गाळपक्षमता साडेतीन हजार मे. टन प्रतिदिनवरून पाच हजार करण्यात येणार असून, सहवीज निर्मिती प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

शासनाने वीज खरेदीचा दर यापूर्वी निश्चित न केल्याने २०१८/१९ च्या वार्षिक सभेमध्ये सहवीज प्रकल्प आणि विस्तारीकरण स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, शासन चांगला वीज खरेदी दर देण्याच्या विचारात असल्याने १८.५ मेगावॅट क्षमतेचा सहवीज प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पाच हजार मेट्रिक टनांपर्यंत गाळप क्षमता वाढविण्यात येणार असून, यासाठी आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामुळे ८ ते ९ हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाचे गाळप वेळेत करणे शक्य होणार आहे.

कारखान्याच्या संपूर्ण कामकाजाचे संगणकीकरण, छत्रपती राजाराम ॲप, ऊस विकास अभियान, विविध अनुदान योजना सुरू केल्या असून, हे नवे निर्णय सभासदांच्या प्रगतीस कारणीभूत ठरतील असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने, उपाध्यक्ष वसंत बेनाडे यांच्यासह संचालक उपस्थित होते.