शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राजर्षी शाहू स्मृती जागर: फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 11:22 IST

फुले, शाहू, आंबेडकर यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवर तयार झालेल्या राज्यघटनेमुळे लोकशाहीत सर्वांना समान हक्क व न्याय मिळाला; परंतु हा हक्क व न्याय आज खऱ्या अर्थाने मिळतो का, हाच प्रश्न आहे. आज पोशाख कोणता घालावा, काय खावे काय नको, यावर निर्बंध आणले जात आहेत, हे दुर्दैवी आहे.

शाहू छत्रपती

महात्मा जोतिबा फुले यांनी समाजातील पुरोहितशाही, अज्ञान व अस्पृष्यता नाहीशी करण्यासाठी चळवळ सुरू केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी हीच चळवळ आपल्या संस्थानात प्रत्यक्ष कृतीद्वारे चालू ठेवली. उपेक्षित, वंचित समाजाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले- शाहूंच्या विचारांचा प्रत्यक्ष भारतीय राज्यघटनेत समावेश करून खरी लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या तीन समाज सुधारकांनी सुरू केलेले समाजोद्धाराचे कार्य अजून संपलेले नाही. उलट सध्याची देशातील राजकीय तसेच सामाजिक परिस्थिती पाहता या महान समाज सुधारकांचे कार्य आणि विचार अधिक नेटाने, व्यापक पातळीवर पुढे नेण्याची आवश्यकता आहे.

राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानच्या गादीवर विराजमान झाले तेव्हा त्यांनी बहुजन समाजाला आपल्या कार्याचा केंद्रबिंदू मानले. राजा असूनही ऋषींसारखे जीवन जगताना त्यांनी आपल्या राजदंडाचा वापर हा दलित-पतित, तसेच दीनदुबळ्या, वंचित घटकांसाठी केला; परंतु ज्यांना आपले वर्चस्व समाजाच्या प्रत्येक घटकावर राहिले पाहिजे असे वाटत होते, त्या प्रतिगामी शक्तींनी त्यास विरोध केला. त्यांच्या कार्यात खोडा घालण्याचे प्रयत्न केले; परंतु शाहू महाराजांच्या लोककल्याणी कार्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

शाहू महाराजांसह अनेक समाज सुधारकांनी प्रत्यक्षात कृतीतून धर्मनिरपेक्ष समाजनिर्मितीचे प्रयत्न केले. आज मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. जाती, धर्माच्या नावावर समाजात दुही माजविण्याचे प्रयत्न होत आहेत. धार्मिक द्वेष भडकावण्याचा प्रयत्न होत आहे. मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा, महाआरती यासारखे समाजात दुफळी निर्माण करणारे विषय पुढे आणले जाऊ लागले आहेत.

सत्ता व वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता समाजाचे ध्रुवीकरण केले जात आहे. हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणून मुस्लिमांना वेगळे केले जात आहे. हिंदू आणि हिंदुत्व हेच काहींना माहीत नाही. पूर्वीच्या काळी सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांना देशाबाहेरून आलेल्या मुस्लीम लोकांनी हिंदू नाव दिले. रामाने, श्रीकृष्णाने हिंदू हा शब्द कुठे उच्चारल्याचे वाचनात आलेले नाही. हिंदुत्व म्हणजे बंधुभावाने वागणे, ही व्याख्या लोकशाहीत बसणारी आहे.

फुले, शाहू, आंबेडकर यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवर तयार झालेल्या राज्यघटनेमुळे लोकशाहीत सर्वांना समान हक्क व न्याय मिळाला; परंतु हा हक्क व न्याय आज खऱ्या अर्थाने मिळतो का, हाच प्रश्न आहे. आज पोशाख कोणता घालावा, काय खावे काय नको, यावर निर्बंध आणले जात आहेत, हे दुर्दैवी आहे. समाजसुधारकांच्या विचारांपासून समाजाला उलट्या दिशेने नेण्याचा उद्योग सुरू आहे. तथापि, महाराष्ट्राच्या भूमीत फुले- शाहू- आंबेडकर यांचे विचार खोलवर रुजले आहेत, रुजविण्याचा प्रयत्न आजही होत आहे. म्हणूनच देशातील राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता फुले, शाहू, आंबेडकर यांचे कार्य संपलेले नाही, तर अधिक गतीने पुढे नेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती