शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

जलसमाधी आंदोलनावर ठाम- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:25 AM

पूरग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा केली आहे. त्याचे शासन परिपत्रक जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत जलसमाधी आंदोलनावर ठाम आहे. ...

पूरग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा केली आहे. त्याचे शासन परिपत्रक जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत जलसमाधी आंदोलनावर ठाम आहे. निर्णय न झाल्यास रविवार (दि. 5) रोजी हजारो शेतकऱ्यांसोबत नृसिंहवाडी येथील कृष्णा नदीपात्रात जलसमाधी घेणार आहे. त्याची संपूर्ण तयारी झाली आहे, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

येथील जैन सांस्कृतिक सभागृहात संघटनेच्या जलसमाधी आंदोलनासाठी आयोजित संघटनेच्या नियोजन मेळाव्यात शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी अर्बन बँकेचे संचालक मोनाप्पा चौगुले होते.

शेट्टी म्हणाले की, कृषीमूल्य आयोग शेतकरी विरोधी आहे, असा आरोप करत पूरग्रस्तांच्या प्रमुख मागणीसाठी जनआक्रोश आंदोलन केल्याने व जनतेचा रोष ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०१९ प्रमाणे पूरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा केली आहे; मात्र ही घोषणा केवळ राजकीय आहे, असे सांगून यावर आमचा विश्वास नाही. घोषणेचा शासन आदेश काढावा, शिवाय नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत, जिल्ह्यातील पुलाचा भराव खुला करावा ,पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न या मागण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे या निर्णयाचा अध्यादेश आणि अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलनावर ठाम आहे.

यावेळी आण्णासो चौगुले, आदिनाथ हेमगिरे, राजू कूपवाडे, सागर शंभुशेट्टी यांची भाषणे झाली. मेळाव्याला बंडू उमडाळे, नगरसेवक शैलेश चौगुले, शैलेश आडके, अकिवाट सरपंच विशाल चौगुले, बंडू पाटील, दीपक परीट, रामचंद्र फुलारे, कल्लाप्पा शिवमूर्ती, दिलीप पाटील यांच्यासह तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ -कुरुंदवाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खास. राजू शेट्टी बोलत होते. यावेळी कल्लाप्पा चौगुले, दिलीप पाटील, शैलेश आडके आदी.