शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

राजू शेट्टींची १७ ऑक्टोबरपासून ‘आत्मक्लेश पदयात्रा’: २२ दिवस ५२२ किलोमीटर चालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 12:22 PM

कारखान्यातून एकही साखरेचे पोते बाहेर पडू देणार नाही

कोल्हापूर : मागील गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाला चारशे रुपये दिल्याशिवाय कारखान्यांची धुराडे पेटू देणार नाही, असा गर्भित इशारा देत साखर कारखान्यांना दिलेली मुदत संपली असून, आता कारखान्यातून एकही साखरेचे पोते बाहेर पडू देणार नाही. त्याचबरोबर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किलोमीटरची आत्मक्लेश पदयात्रा काढणार आहे. या यात्रेची सांगता ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपुरातील ऊस परिषदेने करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.शेट्टी म्हणाले, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून कारखानदारांना चारशे रुपये देण्यासाठी २ ऑक्टोबरची मुदत दिली होती. ती संपली असून, एकही कारखानदार बोलण्यास तयार नाही. गांधी जयंतीनिमित्त सोमवारी प्रत्येक कारखान्यावर जाऊन ढोलताशे वाजवून कारखानदारांना जागे करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३७ कारखान्यांवर १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘आत्मक्लेश’ पदयात्रा काढणार आहे.

२२ वी ऊस परिषद आणि २२ दिवस पदयात्रा‘स्वाभिमानी’ची यंदाची २२ वी ऊस परिषद आहे. त्यामुळे आत्मक्लेश पदयात्रेचे नियोजन २२ दिवस आणि ५२२ किलोमीटर केले आहे.

सीमाभागातील कारखानेही सुरू करू देणार नाहीया आंदोलनाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात असून, सीमाभागातील कारखानेही सुरू करू देणार नाही. त्याचाच भाग म्हणून ५ ऑक्टोबरला बेडकिहाळ येथे शेतकरी मेळावा, तर ९ ऑक्टोबरला कर्नाटक राज्य रयत संघटनेसोबत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने