शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Ramdas Athawale: “शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार”; रामदास आठवलेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 7:03 PM

Ramdas Athawale: या हल्ल्याशी भाजपचा संबंध नसून, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे ठाकरे सरकारने योग्य पद्धतीने लक्ष दिले नाही, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक मुंबईतील निवसास्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्लामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीसह भाजप नेत्यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी आरोप-प्रत्यारोपही झाले. यानंतर आता रिपाइंचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवत, शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे, या शब्दांत रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. 

कोल्हापुरात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांच्या घरावर हल्ला होणे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही बाब गंभीर आहे. कोणत्याही नेत्याच्या घरावर अशा प्रकारे हल्ला होणे चुकीचे आहे, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच भाजप सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत होते. आताच्या सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही. हे सरकार आल्यापासून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यापासून आंदोलन करत असल्याचे आठवले यांनी नमूद केले. 

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे. भाजपची याचा काही संबंध नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले नाही. एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्यास हरकत नाही, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. एसटी ही ग्रामीण भागात देणारी सेवा असून, एसटीला मदत करणे सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे विलिनीकरण व्हावे, ही आमची भूमिका आहे, असे नमूद करत काही असले तरी शरद पवार यांच्या घरावर हल्ला होणे हे निषेधार्हच आहे. या प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे आणि दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आठवले यांनी केली. 

दरम्यान, याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले मत व्यक्त केले. मुख्यमंत्री हे प्रकरण हाताळत आहे आणि स्वतः शरद पवार हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ही घटना परत व्हायला नको, याची काळजी घ्यायला हवी. यावर राज्य सरकार पुढे लक्ष देईल, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी