शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

रविकांत तुपकर यांचा ‘स्वाभिमानी’शी संबंध संपला; प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 12:56 IST

काही मतमतांतरे असतील तर चर्चेतून मार्ग निघाला असता; पण..

कोल्हापूर : रविकांत तुपकर हे गेली चार वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेसह दोन राज्य कार्यकारिणीच्या बैठकींना हजर राहिले नाहीत. याउलट ते संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका करीत आहेत. चळवळीचे नुकसान होऊ नये म्हणून आतापर्यंत खूप सहन केले. यापुढे स्वाभिमानी संघटना व पक्षाशी तुपकर यांचा संबंध नाही. त्यांचे संघटनेतील योगदान पाहता, त्यांना काढून टाकले हा शब्द आपण वापरणार नाही, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.प्रा. पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी गेली २२ वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली राजू शेट्टी लढत आहेत. स्वर्गीय शरद जोशी यांच्यानंतर कष्टकऱ्यांना आपले वाटणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्र पाहतो; पण, रविकांत तुपकर हे सातत्याने राजू शेट्टी यांच्यावर टीका करीत आहेत. ‘स्वाभिमानी’ संघटना हा परिवार आहे, यामध्ये काही मतमतांतरे असतील तर चर्चेतून मार्ग निघाला असता; पण, तुपकर सोशल मीडियातून सातत्याने चळवळीला हानिकारक वक्तव्य करीत आहेत.

आता तर ते पुण्यात बैठक घेऊन स्वतंत्र सुभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण, २६ सप्टेंबर २०१९लाच तुपकर यांनी स्वाभिमानी पक्ष व संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे, तरीही त्यांना राज्य कार्यकारिणीसाठी स्वतंत्रपणे निमंत्रण दिले होते, ते आलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा ‘स्वाभिमानी’शी काही संबंध नाही.

अडीच लाख मतांनी हुरळून जाऊ नकारविकांत तुपकर हे लोकसभेला बुलढाण्यातून लढले. त्यांनी मदतीसाठी राजू शेट्टींना फोन केल्यानंतर कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत राहण्यास सांगितले. त्यांना अडीच लाख मते मिळाली, याचा अभिमान आम्हाला आहे, म्हणून त्यांनी हुरळून जाऊ नये, असा सल्लाही प्रा. पाटील यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRavikant Tupkarरविकांत तुपकर