शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Kolhapur: काळम्मावाडीची गळती तातडीने काढा, सतेज पाटील यांची अधिवेशनात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:09 IST

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणाला मागील दोन वर्षे गळती सुरू असून, सध्या प्रतिसेकंद २७७ लिटर इतके पाणी वाया जात आहे. ...

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणाला मागील दोन वर्षे गळती सुरू असून, सध्या प्रतिसेकंद २७७ लिटर इतके पाणी वाया जात आहे. गळती थांबवण्यासाठी यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ऐन उन्हाळ्यात याचा संपूर्ण जिल्ह्यावर ताण पडू शकतो, त्यामुळे सरकारने ही गळती थांबवण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपण मांडलेला विषय गंभीर आहे, गळती असेल तर ती तपासावी लागेल, जलसंपदा विभागाला याबाबत निर्देश देऊ, अशी ग्वाही दिली.जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील धरणाला माेठ्या प्रमाणात गळती लागली आहे. जिल्ह्यातील राधानगरी, कागल, करवीर, हातकणंगले, शिरोळ, भुदरगडमधील १२१ गावांमधील ४६ हजार हेक्टर क्षेत्राला याच धरणातून पाणीपुरवठा होतो. शिवाय कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून पिण्यासाठी पाणी दिले जाते. या धरणाची २५.३९ टीमएसी इतकी क्षमता आहे.मात्र, गेल्या काही वर्षांपासून या धरणाच्या भिंतीला गळती लागल्याने रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या धरणाची गळती काढण्यासाठी राज्य सरकारने ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, निविदा प्रक्रिया झाली नसल्याने पुढील काम थांबले आहे. ही गळती वाढल्याने आमदार पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. नुकतेच बिद्री कारखाना व गोकुळचे संचालक आर. के. मोरे यांनी दुधगंगा काठावरील सरपंचांना घेऊन पाटबंधारे विभागास गळती काढण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन