शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

विरोधी उमेदवारांबद्दल आदर, पक्षनिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:51 AM

मी मूळची कºहाडची. माझे वडील वासुदेव किरपेकर हे स्वातंत्र्यसेनानी. सक्रिय चळवळीमुळे त्यांना सहा वर्षांचा तुरुंगवास झाला होता. येरवडा जेलमध्ये ...

मी मूळची कºहाडची. माझे वडील वासुदेव किरपेकर हे स्वातंत्र्यसेनानी. सक्रिय चळवळीमुळे त्यांना सहा वर्षांचा तुरुंगवास झाला होता. येरवडा जेलमध्ये ते आणि यशवंतराव चव्हाण एकाच बरॅकमध्ये होते. माझ्या घरी कायमच यशवंतरावांसह अनेक मोठ्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा राबता असायचा. त्यावेळी काँग्रेसचे चिन्ह होते बैलगाडी. पुढे हात चिन्ह आले.मी जो काळ पाहत मोठी झाले, वाढले त्या काळात उमेदवार एकमेकांचा आदरपूर्वक उच्चार करायचे. पक्ष असो वा व्यक्ती दोन्ही पातळींवर एका मर्यादेचे पालन केले जायचे. समजुतीने निर्णय घेतले जायचे. आपण संसदेत जाण्याकरीता ज्या पदासाठी निवडणूक लढवत आहोत त्या पदाचा सन्मान आणि आदर राखून प्रचारात भाषा वापरली जायची. निवडणुका आल्या की शहरात वेगळेच वातावरण असायचे. त्यावेळी यशवंतराव चव्हाण कºहाडमधून लढायचे, तेव्हा आजच्यासारखी हायटेक प्रचारयंत्रणा नव्हती. त्यामुळे कितीही मोठा नेता असला तरी घरोघरी जाऊन, प्रत्येक मतदाराला भेटून आपल्याला मतदान करण्यासाठी आवाहन करायचे. कोणताही डामडौल नाही की अफाट खर्च नाही. मी पहिल्यांदा मतदान केले १९६९-७०च्या दरम्यान तेही कोल्हापुरात. त्यावेळी आपल्या मताला, विचारांना काही महत्त्व आहे या जबाबदारीची जाणीव झाली. त्यावेळी नेत्यांमध्ये पक्षनिष्ठा असायची. त्यांच्या ‘शब्दा’वर जनतेचा विश्वास बसायचा आणि नेतेही दिलेले आश्वासन पूर्ण करायचे. प्रश्न सोडवायचे. आता ती विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे कोणताही उमेदवार निवडून आला तरी सर्वसामान्यांच्या परिस्थितीत काही फरक पडत नाही असे एक निराशाजनक चित्र आहे.गेल्या काही वर्षांत निवडणुकीतील प्रचाराने खालचे टोक गाठले आहे. जिंकणे हे उद्दिष्ट असले तरी त्यात आजच्यासारखी एकमेकांवर जहरी आणि हीन टीकाकेली जात नसे किंवा दुसऱ्याला ठरवून खाली खेचण्यासाठीची स्पर्धा नव्हती. आता निवडणुकीच्या काळात आणि इतरवेळीही जे काही घडतंय ते आमच्यासारख्यांच्या बुद्धीपलीकडचे आहे. आपलानेमका अजेंडा काय, आपले विचार काय, आपण काय करतोय आणि नेमकं काय साधायचंय याबद्दल कार्यकर्तेच काय नेत्यांचीही दृष्टी धूसर झाली आहे, असे दुर्दैवाने वाटते.-डॉ. वासंती टेंबे, जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका