शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Jignesh Mevani: ..त्याच दिवशी देशात क्रांती, जिग्नेश मेवानी यांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 13:09 IST

मुश्रीफ यांचा विजय हेच शाहूंचे विचार

कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात उद्योगपतींच्या खिशातील सरकार असून ज्या दिवशी शेतकरी, मजुरांच्या हातात सत्ता येईल, त्याच दिवशी देशात क्रांती होईल, असे प्रतिपादन गुजरात काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी केले.डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, राज्य शासन कृषी विभाग, आत्मा व कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या वतीने तपोवन मैदान येथे आयोजित ‘सतेज कृषी प्रदर्शन’च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते.आमदार मेवानी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हे प्रयोगशील आहेत. येथील शेती व दुग्ध व्यवसायातील तंत्रज्ञान गुजरात राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, ‘गोकुळ’कडून खूप शिकण्यासारखे असून त्यासाठी आपण प्रयत्नशील आहे.आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञान अवगत करत उत्पादकता दुप्पट करावी. केंद्रातील सरकारचे धोरण पाहिले तर नोकऱ्या मिळणार नसल्याने तरुणांनी आधुनिक शेतीची कास धरून सक्षम व्हावे.आमदार सतेज पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना एकाच छताखाली आधुनिक तंत्रज्ञान मिळणार असून ते आत्मसात करुन उत्पादकता वाढवावी. जिल्ह्यात ९२ टक्के अल्पभूधारक शेतकरी असून कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याचे सूत्र येथे शेतकऱ्यांना मिळणार आहे. विनोद पाटील यांनी स्वागत केले. प्राचार्य महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार प्रा. जयंत आसगावकर, जयश्री जाधव, के. पी. पाटील, बजरंग देसाई, सुरेश साळाेखे, संजय पवार, विजय देवणे, राजीव आवळे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, तेजस सतेज पाटील, मुरलीधर जाधव, सचिन चव्हाण, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, ‘रामेती’चे प्राचार्य उमेश पाटील, डॉ. अशोक पिसाळ, जालंदर पांगरे आदी उपस्थित होते.मुश्रीफ यांचा विजय हेच शाहूंचे विचारएकीकडे शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न सुरू असताना हसन मुश्रीफ यांच्यासारखा अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती गेली २५ वर्षे आमदार म्हणून निवडून येत आहेत, हे फक्त कोल्हापुरातच घडू शकते. हेच राजर्षी शाहू महाराजांचे विचार असल्याचे आमदार मेवानी यांनी सांगितले.‘डी. वाय.’ यांचा वारसा ‘सतेज’ यांनी चालवलाडॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव गुजरातमध्ये उच्चारले की शैक्षणिक संकुल डोळ्यासमोर येते. त्यांचा शैक्षणिक व विचारांचा वारसा सतेज पाटील यांनी सक्षमपणे पुढे ठेवल्याचे गौरवोद्गार आमदार मेवानी यांनी काढले.

शिरोळचे शेतकरी हुशारजिल्हा बँक पाच लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देत असल्याचे सांगत, हेच पैसे ८ टक्क्यांनी बँकेत ठेवले तर वार्षिक ४० हजार व्याज मिळते. याबाबत शिरोळचे शेतकरी फार हुशार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJignesh Mevaniजिग्नेश मेवानीFarmerशेतकरी