शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

पोलिसांचा थंडावला दंडा, भाईगिरीचा नवा फंडा; ‘हाफ मर्डर’ करायचा, चार दिवस कारागृहात काढायचे अन्..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 12:02 PM

शहर व परिसरात सध्या किरकोळ वादातून जीवघेणे हल्ले, मारामारी

तानाजी पोवार

कोल्हापूर : विना कष्ट अमाप पैसा मिळविण्यासाठी कुणाचा तरी ‘हाफ मर्डर’ करायचा, चार दिवस कारागृहात काढायचे अन् बाहेर येऊन गळ्यात पिवळ्या धमक साखळ्या अडकून भाईगिरी गाजवायची. मग पुढे खंडणी, फाळकूटदादा, वाटमारी, कुळे काढणे, मटक्यांचे अड्डे, पत्त्यांचे क्लब चालविण्याचे त्यांना जणू लायसन्सच मिळते.बेकायदेशीर धंद्यातून बक्कळ पैसा मिळवायचा. त्यातूनच भागावर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी प्रतिस्पर्धी गॅंगशी दोन हात करायचे. ओठावर मिसरुड फुटण्यापूर्वीच कोवळी पोरं हातात नंग्या तलवारी घेऊन गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करू लागली आहेत.कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत ‘मोक्का’ कारवाईत मोठ्या संख्येने गुंडांना कारागृहात बसावे लागले; पण त्यामुळे दुसऱ्या स्थानावरील गुंडांचे फावले असून ते आज या टोळींच्या प्रमुखांच्या जागा घेण्यासाठी मोठमोठे गुन्हे करताना दिसत आहेत.शहर व परिसरात सध्या किरकोळ वादातून जीवघेणे हल्ले, मारामारी होतात. या गुंडांकडून राजरोसपणे नंग्या तलवारी घेऊन भागात दहशत माजवली जात आहे. किरकोळ वाद झाला तरीही तलवारी, कुकरी, एडका, गुप्ती, आदी प्राणघातक हत्यारे सपासप बाहेर पडतात. या गुंडांना खरंच पोलिसांचे भय नाही का? असा प्रश्न समाजासमोर उभारला आहे.वारे वसाहत, सुधाकर जोशी नगर, राजेंद्रनगरात होणारे प्रकार हे त्याचाच एक भाग आहे. शनिवारी वारे वसाहतीतील घडलेला प्रकार हा सर्वसामान्यांच्या अंगावर थरकाप उडविणारा आहे. कोल्हापुरात सध्या जुना राजवाडासह शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरीसह करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी टोळ्यांचे प्रस्त वाढतच चालले आहे.

बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू

- ‘बेकायदेशीर व्यवसाय बंद आहेत’ असे मोठ्या दिमाखात सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सध्या मटका, जुगार क्लब, दारू तस्करी, गावठी हातभट्ट्या, आदी राजरोसपणे बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत.- या गुंडांकडूनच हे व्यवसाय चालविले जात आहेत. पोलीस ठाण्यातील डीबी पथकांशी त्यांचे असणारे लागेबांधे यामुळे सर्वसामान्य माणूस तक्रारीसाठी पुढे येत नाही.

कारागृहातून सुटताच जंगी मिरवणुका

गुन्हे करायचे, कारागृहात काही दिवस बसायचे. जामीन झाला की वाजत-गाजत मिरवणूक काढायची. गुंडगिरीचे वजन वाढविण्यासाठी अलीकडे ही क्रेझच झाली आहे. त्यातूनच गुन्हेगारी फोफावू लागली आहे.

वारे वसाहतीत झाला जंगी वाढदिवस

- वारे वसाहतीतील राड्यापूर्वी दोन दिवस अगोदरच तेथेच एकाचा जंगी वाढदिवस झाला.- हजारभर जणांनी तांबड्या-पांढऱ्यावर ताव मारला. तेथेच खरी वादाची ठिणगी पडली.- पोलिसांना हे माहीत असूनही त्याकडे कानाडोळा केला. त्याचेच पडसाद हाणामारीवर उमटले; पण दोन्हीही गटांकडे मारामारीचे खरे कारण समोर आणण्याचे धैर्यच नव्हते.

- पाच वर्षात ‘मोक्का’ कारवाई : ४८ टोळ्या, ३०२ गुंड अटक

- २०२१ मध्ये कारवाई : जुगार - १०१०, दारूबंदी -२६०३

- गर्दी, मारामारीच्या घटना : ३९१ गुन्हे

- बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर कारवाई : १३ गुन्हे (११ रिव्हॉल्व्हर, ६ रायफल)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस