राजाराम लोंढेकोल्हापूर : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ अखेरचे प्रलंबित मानधन आता मिळणार आहे. संबंधितांच्या खात्यावर ११३ कोटी ४७ लाख रुपये वर्ग करण्यात आले असून, त्यामुळे राज्यातील १ लाख ५२ हजार ४६४ मदतनीसांना दिलासा मिळाला आहे.प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना ही केंद्र सरकारची असून, ती राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वयंपाक्यांवर असते. त्यांना केंद्र सरकारकडून दरमहा सहाशे रुपये, तर राज्य सरकारकडून १९०० असे प्रतिमहिना २५०० रुपये मानधन मिळते. वर्षातून दहा महिन्यांचे मानधन त्यांना दिले जाते. मात्र, स्वयंपाक्यांना ऑक्टोबरपासून मानधन मिळालेले नव्हते.असे आले पैसे
- केंद्र सरकारकडून - ९ कोटी १४ लाख ७८ हजार ४०० रुपये
- राज्य सरकारकडून - २८ कोटी ९६ लाख ८१ हजार ६०० रुपये
शिक्षणाधिकाऱ्यांना हे राहणार बंधनकारकज्या कारणासाठी रक्कम मंजूर करण्यात आली, त्याच कारणासाठी खर्च करण्याची दक्षता घ्यावी.अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र व मासिक खर्च अहवाल संचालनालयास सादर करावा.अनुदान अदा करताना शासनाच्या प्रचलित नियमांचे पालन करावे.स्वयंपाक्यांसोबत केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींची पूर्तता केल्याची खात्री करावी.जिल्हानिहाय मदतनीस संख्या जिल्हा - मदतनीसअहिल्यानगर - ८७६५अकोला - २८७६अमरावती - ३७८५छत्रपती संभाजीनगर - ५७३१भंडारा - २१४२बीड - ५३२०बुलढाणा - ४२९५चंद्रपूर - ३५७३धुळे - ३१२०गडचिरोली - २७२०गोंदिया - २४३७हिंगोली - २१४०जळगाव - ६०६०जालना - ४००१कोल्हापूर - ६०९०लातूर - ४१११मुंबई - १०२०नागपूर - ४२२७नांदेड - ५६५७नंदुरबार - ३३९४नाशिक - ८५०२धाराशिव - ३०४६पालघर - ४६४०परभणी - ३४५३पुणे - ८६५३रायगड - ४७०१रत्नागिरी - ३९५८सांगली - ४४८८सातारा - ५८००सिंधुदुर्ग - २१६१सोलापूर - ७७५३ठाणे - ३८९२वर्धा - २००७वाशिम - २१९६यवतमाळ - ५८३०