शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
7
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
8
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
9
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
10
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
11
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
12
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
13
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
14
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
15
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
16
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
17
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
18
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
19
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
20
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 6:26 PM

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी या हंगामातील शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकवले आहेत. यामध्ये जुन्या २९ कोटी रूपयांचाही समावेश आहे. ही थकित रक्कम आणि न दिलेल्या रकमेवरील व्याज मिळाल्याशिवाय पुणे येथील आंदोलन बंद केले जाणार नाही असा स्पष्ट इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.

ठळक मुद्देसाखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकितरघुनाथ पाटील यांचा आरोप, कोल्हापूर,सांगलीतील कारखाने

कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी या हंगामातील शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकवले आहेत. यामध्ये जुन्या २९ कोटी रूपयांचाही समावेश आहे. ही थकित रक्कम आणि न दिलेल्या रकमेवरील व्याज मिळाल्याशिवाय पुणे येथील आंदोलन बंद केले जाणार नाही असा स्पष्ट इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.दोन्ही साखर कारखान्यांनी नेमकी किती रक्कम थकवली आहे याची अधिकृत आकडेवारी सांगत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी कायदा मोडणाऱ्या कारखानदारांना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.पाटील म्हणाले, एकीकडे उच्च न्यायालयाने २0१३ मध्ये सर्व कारखान्यांना सर्व ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना एका हंगामामध्ये वेगवेगळा दर देता येणार नाही असा निर्णय दिला असताना आताही आधीच्या शेतकऱ्यांना एक तर नंतरच्या शेतकऱ्यांना एक दर दिला जात आहे.शेतकऱ्यांना चौदा दिवसात एफआरपी द्यावी असा कायदा असताना तो न पाळणाऱ्यांना शिक्षा न देता,त्यांचा गाळप परवाना रदद न करता त्यांनाच पाठीशी घातले जात आहे. केवळ एफआरपी देवून चालणार नाही. तर थकलेल्या रकमेवरील १५ टक्के व्याजही मिळाले पाहिजे असे पाटील म्हणाले.पत्रकार परिषदेला शिवाजी माने, धनाजी चडमुंगे, पी. जी. पाटील, अ‍ॅड. माणिक शिंदे, अजित पाटील, राजू कुरंदाळे, बळवंत कुलकर्णी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर