शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

शासनाकडून एस. टी. कर्मचाऱ्यांवर अन्याय : संदीप शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:24 AM

शिरोळ : एस. टी. कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळात जिवाची बाजी लावून काम केले आहे. ३०४ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला; परंतु एस. ...

शिरोळ : एस. टी. कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळात जिवाची बाजी लावून काम केले आहे. ३०४ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला; परंतु एस. टी. कर्मचारी हा पगारासाठी हवालदिल झाला आहे. कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने सतत अन्याय केला आहे. त्यामुळे शासनाने कर्मचाऱ्यांचे पालकत्व स्वीकारून एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे; अन्यथा आगामी काळात मोठे आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य एस. टी. कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी शिरोळ येथे पत्रकार परिषदेत दिला.

कुरुंदवाड एस. टी. आगाराला गुरुवारी राज्याध्यक्ष शिंदे यांनी भेट दिली. त्यानंतर जिल्ह्यातील विभागीय बैठक घेऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, महापुराच्या काळात कुरुंदवाड आगाराचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी एस. टी.चे नुकसान होऊ दिले नाही, ही बाब कौतुकास्पद आहे. कर्मचाऱ्यांना वेतन नसल्यामुळे पगारासाठी भीक मागावी लागत आहे. ‘शिवशाही’सारख्या बसेस सुरू करून ईस्ट इंडिया कंपनी होऊ द्यायची नाही. कर्मचाऱ्यांना सातवा वेतनही शासनाने लागू केलेला नाही. त्यामुळे एस. टी.ला वाचविण्यासाठी येणाऱ्या काळात व्यापक लढा उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी युनियनचे सचिव शिवाजीराव देशमुख, शीला नाईकवडे, जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील, वसंत पाटील, निनाद भोसले, रवींद्र भोसले, अरुणा पाटील, मनीषा मुळुक, अश्विनी धमाल, आशपाक नालबंद, गणेश शेडबाळे, अरुण वास्कर, चंद्रकांत पवार, रामचंद्र गोसावी, संतोष जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो - ०२०९२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - शिरोळ येथे एस. टी. महामंडळाचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या.