शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

भ्रष्ट महापालिका बरखास्त करा

By admin | Published: June 24, 2015 12:36 AM

शिवसेना : दूषित पाण्याच्या बाटल्यांचे तोरण

कोल्हापूर : महापालिकेत भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे पुढे येत आहेत. शहरात पिण्याच्या पाण्यासह कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. शहरास पायाभूत सुविधा देण्यास कमी पडणारी ही महापालिका बरखास्त झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी महापालिकेवर मोर्चा काढून केली. दूषित पाण्याचे तोरण शिवसैनिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारास बांधले. आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदन देत क्षीरसागर यांनी शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.बिंदू चौकातून दुपारी साडेबारा वाजता या मोर्चास सुरुवात झाली. ‘भ्रष्ट महापालिका बरखास्त करा’ ‘शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, सुनील जाधव, नगरसेविका स्मिता माळी, नगरसेवक महेश कदम आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहरातील विविध प्रश्नांकडे शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन याबाबत गंभीर नाही. बोगस दाखल्यांच्या आधारेच बहुसंख्य काँगे्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले आहेत. गेली ४० वर्षे शहराची हद्दवाढ न झाल्याने शहर गुदरमत आहे. रेड झोन क्षेत्रात भराव टाकून बांधकाम झाल्याने नागरी वस्तीत पुराचे पाणी येण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या शाळांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. मनपाच्या रुग्णालयात सुविधांची वानवा आहे. झोपडपट्टी व फेरीवाल्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. असे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेली महापालिका बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी आयुक्तांना सांगितले. किमान नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. (प्रतिनिधी)