शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

रास्त भाव दुकानात जीवनावश्यक वस्तूंची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:26 AM

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांत जीवनावश्यक वस्तूंची विक्री ११ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. येथील वस्तूंची किंमत ...

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांत जीवनावश्यक वस्तूंची विक्री ११ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. येथील वस्तूंची किंमत खुल्या बाजारपेठेपेक्षा कमी असेल. यासाठी जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई, रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, रास्त भाव दुकानात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे आणि संघाने प्रमाणित केलेल्या स्वदेशी कंपन्यांनी उत्पादित केलेल्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री शहरातील १७०, तर जिल्ह्यातील १६०० रास्त भाव दुकानांतून होईल.

रास्त भाव दुकानात कपडे धुण्यासाठीचा साबण, चंदन साबण, मध, गुलकंद, आमसोल, खोबरेल तेल, बदाम तेल, हर्बल तेल, पापड आदी जीवनावश्यक वस्तूंसह चादरी, सतरंजी, पायपुसणी, घोंगडी, शबनम बॅग, टॉवेल, पायजमा, रूमाल, नॅपकीन विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. या वस्तू विक्रीमुळे संघ आणि रास्त भाव दुकानांना काही प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळेल. या वस्तू रेशनकार्ड धारकांसह इतर ग्राहकांनाही खरेदी करता येणार आहेत. पण रेशन घेताना या वस्तू खरेदी करण्याची कोणत्याही प्रकारची सक्ती नाही.

पत्रकार परिषदेस संघाचे उपाध्यक्ष प्रकाश चौगुले, ज्येष्ठ संचालक सखाराम सुतार, संचालिका गीता गुरव, सविता देसाई उपस्थित होते.