शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

संभाजीपूरचा प्रस्ताव प्रलंबित : उपनगरे जयसिंगपूर पोलीस ठाण्याला जोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:27 IST

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील त्रेपन्नावे गाव म्हणून ओळखले जाणाºया संभाजीपुरातील सर्वच उपनगरे जयसिंगपूर पोलीस ठाण्याला जोडावीत, या मागणीचा प्रस्ताव

संदीप बावचे।जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील त्रेपन्नावे गाव म्हणून ओळखले जाणाºया संभाजीपुरातील सर्वच उपनगरे जयसिंगपूर पोलीस ठाण्याला जोडावीत, या मागणीचा प्रस्ताव चार वर्षांपासून प्रलंबित राहिला आहे. गाव एक आणि पोलीस ठाणी दोन अशा परिस्थितीमुळे बहुतांशी उपनगरातील नागरिकांना पाच किलोमीटर अंतरावर असणाºया शिरोळ पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सन २०१३ साली शिरोळ तालुक्यातील त्रेपन्नावे गाव म्हणून संभाजीपूरची स्थापना झाली. ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर उपनगरांना भेडसावणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी तत्कालीन सरपंच सविता पाटील-कोथळीकर यांनी पुढाकार घेऊन संभाजीपूरमधील शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारी उपनगरे जयसिंगपूर पोलीस ठाण्याशी जोडावीत, अशा मागणीचा प्रस्ताव दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण भागात असलेली पद्मावती कॉलनी, बालाजी पार्क, शिखरे कॉलनी, माता सावित्रीबाई फुले गृहनिर्माण संस्था यासह सुमारे चौदा उपनगरे शिरोळ पोलीस ठाण्याशी निगडित आहेत.

एखाद्या अपघाताची घटना घडल्यास शिरोळ पोलीस ठाण्यालाच नागरिकांना संपर्क करावा लागतो. मात्र, अवघ्या काही अंतरावरच जयसिंगपूर पोलीस ठाणे असतानाही केवळ हद्दीमुळे नागरिकांना नाइलाज होतो. शिरोळ-कोल्हापूर बायपास मार्गावर अपघाताची माहिती समजताच जयसिंगपूर पोलीस तत्काळ हजर होतात. मात्र, अंतरामुळे शिरोळ पोलीस ठाण्याला वेळ लागतो.

अशा नाहक त्रासामुळे संभाजीपूर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली उपनगरे जयसिंगपूर पोलीस ठाण्याला जोडावीत, असा प्रस्ताव पोलीस खात्याकडे दाखल केला. सन २०१४मध्ये हा प्रस्ताव जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयामार्फत जिल्हा पोलीसप्रमुखांना पाठविण्यात आला आहे. तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीदेखील या प्रस्तावाला शिफारस दिली होती. मात्र, हा प्रस्ताव गृहखात्याच्या लालफितीत अडकला आहे. अनेकवेळा पाठपुरावा करूनदेखील हा प्रस्ताव प्रलंबित पडला आहे. गाव एक आणि पोलीस ठाणे दोन यामुळे नागरिकांचीहोणारी गैरसोय केव्हा थांबणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वास्तविक, कायदा व सुव्यवस्थेचाप्रश्न निर्माण झाल्यास तत्काळ पोलीस यंत्रणा पोहोचण्यासाठी शेजारील पोलीस ठाणेच उपयुक्तठरते. असे असतानाही वरिष्ठपोलीस प्रशासन यंत्रणा कागदी घोडे नाचवीत आहे, असेच चित्र दिसून येत आहे.नांगरे-पाटील यांना साकडेकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी नागरिकांशी सुसंवाद या कार्यक्रमांतर्गत प्रश्न जाणून घेतले होते. यावेळी संभाजीपूरच्या या प्रश्नाबाबत नांगरे-पाटील यांना साकडे घालण्यात आले होते. त्यांनीही याप्रश्नी लक्ष घालू असे आश्वासन दिले होते. त्यांनाही या प्रश्नाचा विसर पडला असल्याचेच चित्र सध्यातरी दिसत आहे. 

संभाजीपूरमध्ये उपनगरांचा जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समावेश करावा, या मागणीसाठी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ग्रामपंचायत पदाधिकाºयांचे शिष्टमंडळ घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांची भेट घेणार आहोत.- दिलीप पाटील-कोथळीकर,ग्रामपंचायत सदस्य, संभाजीपूर