शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

कोल्हापुरात डेपोद्वारेच होणार वाळू पुरवठा, बेकायदेशीर वाहतुकीला बसणार चाप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 1:11 PM

जिल्ह्यातील सर्व नद्या बारमाही वाहत असल्याने गेली ६ वर्षे जिल्ह्यात वाळू उपसा बंद

इंदुमती गणेशकोल्हापूर : जिल्ह्यात बारमाही नद्या वाहत असल्याने येथे वाळू उपसा होत नसल्याने शासनाला कोल्हापूरला अन्य जिल्ह्यातूनच डेपोद्वारे वाळू पुरवठा करावा लागणार आहे. स्वस्त दरात वाळू पुरवठा होणार असला तरी त्यासाठी यंत्रणा उभारणे, डेपो तयार करणे यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाला अध्यादेशाची प्रतीक्षा आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात थोड्या फार प्रमाणात होत असलेली अवैध वाळू वाहतुकीला चाप बसणार आहे.हरित लवादाने २०१७ साली ज्या नदीचे पात्र कोरडे असते त्याच नदीतून वाळू उपसा करण्यास परवानगी दिली आहे; पण जिल्ह्यातील सर्व नद्या बारमाही वाहत असल्याने गेली ६ वर्षे जिल्ह्यात वाळू उपसा बंद आहे. तरीही नदीकाठच्या काही गावांमध्ये अंधारात बेकायदेशीररित्या वाळू उपसा होतो, वाहतूक होते. हे प्रमाण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे.त्यामुळे शासनाने ६०० रुपये ब्रास याप्रमाणे वाळू विक्रीचा घेतलेल्या निर्णयाने जिल्ह्याच्या अर्थकारणावर फारसा परिणाम होणार नाही, कारण जिल्ह्यात वाळू पट्ट्याचा लिलाव होत नाही. पण अवैधरित्या वाळूची वाहतूक व चढ्या दराने विक्री होते, हा प्रकार थांबेल, असे सरकारी यंत्रणेला वाटते. प्रत्येक तालुक्याला एक डेपो याप्रमाणे जिल्ह्याला वाळू पुरवठा होईल.

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी ९ जणांवर कारवाईजिल्हा खनिकर्म विभागाने गेल्या वर्षभरात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ९ जणांवर कारवाई केली आहे. यातून विभागाला २४ लाख रुपये दंडापोटी मिळाले आहेत.सिलिका, क्रश सॅन्डचे उतरणार दरकोल्हापुरात बांधकामांसाठी कोकणातील सिलिका सॅन्ड व क्रश सॅन्ड वापरला जातो. आता स्वस्तात वाळू मिळणार असल्याने कृत्रिम वाळूचेही दर कमी होतील, अशी अपेक्षा आहे. शासन निर्णयाचे दोन परिणाम होतील, एक तर वाळूचा वापर वाढेल किंवा अन्य जिल्ह्यातून वाळू आणणे, वाहतुकीचा खर्च करण्यापेक्षा कृत्रिम वाळूलाच प्राधान्य दिले जाईल, ज्याचा दर कमी असेल.

अशी असेल प्रक्रियावाळू उपसा, वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाईल. शासनाच्या डेपोतून वाळूची विक्री होईल. प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वाळू संनियत्रण समिती स्थापन होणार आहे. ही समिती वाळू गट निश्चित करून ऑनलाइन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीला शिफारस करेल.

कोल्हापुरात वाळू उपसा होत नसल्याने कृत्रिम वाळूचा वापर अधिक आहे. स्वस्त दरात वाळू विक्रीच्या निर्णयामुळे ग्राहकाला माफक दरात वाळू मिळणार आहे. अवैध वाहतूक थांबणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची हे अध्यादेशानंतरच स्पष्ट होईल. - आनंद पाटील, कोल्हापूर जिल्हा खनिकर्म अधिकारी 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर