शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सतेज पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड घट्ट

By राजाराम लोंढे | Updated: November 20, 2023 12:43 IST

‘गोकुळ,’ जिल्हा बँकेपाठोपाठ ‘बिद्री’ची धुरा : जिल्हा नेतृत्वाची पोकळी भरून काढणार

राजाराम लोंढेकोल्हापूर : काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे; किंबहुना गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांनी जाणीवपूर्वक प्रत्येक तालुक्यात लक्ष देत कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. त्यामुळेच ‘गोकुळ,’ जिल्हा बँकेपाठोपाठ ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांच्या भूमिकेला महत्त्व राहिले आहे. ‘बिद्री’च्या निवडणुकीत पाच जागा तर घेतल्याच; त्याचबरोबर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीची धुराच देऊन त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीवर शिक्कामोर्तबही केले.अलीकडील दहा-पंधरा वर्षांत येथील लोकप्रतिनिधींचे ‘मी आणि माझा मतदारसंघ’ असेच काहीसे समीकरण झाले आहे. दुसऱ्या तालुक्यात लक्ष दिले तर आपल्या अडचणी वाढतील, या भीतीपोटी प्रत्येकाने आपले गड शाबूत राखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच जिल्ह्याचे नेते म्हणून स्वर्गीय रत्नाप्पाण्णा कुंभार, बाळासाहेब माने, उदयसिंगराव गायकवाड, सदाशिवराव मंडलिक, माजी आमदार महादेवराव महाडिक एवढीच नावे घ्यावी लागतात.या नेत्यांनी प्रत्येक तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात ताकद निर्माण केल्याने त्यांना वजा करून जिल्ह्याचे राजकारण कधी करताच आले नाही. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँंग्रेस सोडल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मोठी संधी आली होती. त्यांनी काहीसा प्रयत्न केला; पण जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या राजकारणासाठी त्यांनी ‘कागल’, ‘राधानगरी’, ‘चंदगड’ वगळता इतर तालुक्यांतील दुसऱ्या पक्षाचे नेते दुखावतील या भीतीपोटी त्यांनी तेथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही.त्यामुळे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर जिल्हा नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी आमदार सतेज पाटील यांनी भरून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यात जून २०१९ पासून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पडल्यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात संघटना बळकट करण्याचे धोरण स्वीकारले. त्याचे फलित म्हणून जिल्ह्यात काँग्रेसचे चार विधानसभेचे व दोन विधानपरिषदेचे आमदार निवडून आणत, नेतृत्वाची चुणूक हायकमांडला दाखवली.

‘गोकुळ’मध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन सत्तांतर घडवले. येथेही त्यांनी जागा वाटप करताना भविष्यातील राजकारणाचा विचार करून सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन भौगोलिक समतोल राखला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. ‘बिद्री’ कारखान्यात आतापर्यंत त्यांना एका जागेवर समाधान मानावे लागत होते. यावेळी पाच जागा घेऊन त्यांनी आपले निवडणूकीतील महत्व अधोरिखित केले.कागल वगळता सर्व तालुक्यांत ताकदआमदार सतेज पाटील यांनी अकरा तालुक्यांत आपली निर्णायक ताकद निर्माण केली आहे. ‘कागल’मध्ये तालुकाध्यक्षांसह इतर पदाधिकारी आहेत; पण तेथील गटातटांच्या राजकारणामुळे अजून त्यांनी हात घातलेला दिसत नाही.

तालुकानिहाय अशी आहे सतेज पाटील यांची ताकद..

  • कोल्हापूर शहर, करवीर, गगनबावडा : स्वत:चा गट
  • राधानगरी : ‘गोकुळ’चे संचालक राजेंद्र मोरे, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले
  • भुदरगड : माजी सभापती सत्यजित जाधव, मधुअप्पा देसाई, सचिन घोरपडे, जीवन पाटील, शामराव देसाई, आदी.
  • चंदगड : ‘दौलत’चे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील.
  • आजरा : ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर, अभिषेक शिंपी.
  • शाहूवाडी : ‘गोकुळ’चे संचालक कर्णसिंह गायकवाड.
  • पन्हाळा : ‘गोकुळ’चे संचालक अमरसिंह पाटील
  • हातकणंगले : शशांक बावचकर, शशिकांत खवरे, राहुल खंजिरे यांसह ‘राजाराम’ कारखान्याशी संबधित पदाधिकारी
  • शिरोळ : गणपतराव पाटील
  • गडहिंग्लज : विद्याधर गुरबे
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस