शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

शिवरायांच्या आदर्शांवरच सयाजी महाराजांची वाटचाल: बाबा भांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:50 IST

सर्व जातिधर्मांतील लोकांना सोबत घेऊन, हिंदवी स्वराज्य स्थापन करून जनकल्याणाचे काम करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांवरच बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची वाटचाल राहिली. त्यांच्या अंगी शिवरायांचे गुण बाणले गेल्याने त्यांनी अनेक वर्षे इंग्रजांना गुंगारा दिला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड (औरंगाबाद) यांनी येथे केले.

ठळक मुद्देशिवरायांच्या आदर्शांवरच सयाजी महाराजांची वाटचाल: बाबा भांड कोल्हापुरात मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला

कोल्हापूर : सर्व जातिधर्मांतील लोकांना सोबत घेऊन, हिंदवी स्वराज्य स्थापन करून जनकल्याणाचे काम करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांवरच बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची वाटचाल राहिली. त्यांच्या अंगी शिवरायांचे गुण बाणले गेल्याने त्यांनी अनेक वर्षे इंग्रजांना गुंगारा दिला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड (औरंगाबाद) यांनी येथे केले.शाहू स्मारक भवन येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्याकोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेत ‘सयाजी महाराजांच्या नजरेतून छत्रपती शिवराय’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक बंडोपंत सावंत होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, डॉ. संदीप पाटील, बंडा महाराज यादव, सुहास निंबाळकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.बाबा भांड म्हणाले, छत्रपती शिवरायांचे सर्व जातिधर्मांतील लोकांना सोबत घेऊन जाणे व जनकल्याणाचे काम करणे हे गुण अंगीकारत सयाजी महाराजांनी आपली वाटचाल सुरू ठेवली. शिवरायांचे गुण अंगी बाणले गेल्याने सयाजी महाराजांनी अनेक वर्षे इंग्रजांच्या गुप्तहेर खात्यालाही गुंगारा दिला.ते पुढे म्हणाले, कळवणा (जि. नाशिक) येथील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा नंतर सयाजी महाराज यांच्या रूपाने बडोद्याचा राजा बनला. ते दूरदृष्टी असलेले राजे होते. जनकल्याणामध्येच आपला मोक्ष आहे, या विचारातून त्यांनी कार्य सुरू ठेवले. अस्पृश्य आणि आदिवासींच्या शिक्षणासाठी आपल्या संस्थानात त्यांनी हुकूम काढला. तो जगातील पहिला हुकूम होता. संस्थानात शाळा स्थापन केल्या, वसतिगृहे बांधली, विद्यार्थ्यांना पाटी व पेन्सिल देत महात्मा फुले यांच्या विचाराने काम केले. भारतातील पहिली भाषांतर शाखा त्यांनी बडोद्यात सुरू केली. शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत भरीव काम केल्याने ब्रिटिशांनाही त्यांचा हेवा वाटू लागला.राजू परांडेकर यांनी स्वागत केले. वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. इंद्रजित सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संतोष पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्रकाश पाटील, निवृत्ती पाटील, अवधूत पाटील, भगवान काटे, गुलाबराव घोरपडे, आदी उपस्थित होते.भाऊबंदकीने मराठा साम्राज्य गुंडाळलेजगाचा इतिहास पाहिल्यास अनेक राज्यकर्त्यांनी ५०० ते ६०० वर्षे सत्ता गाजविल्याचे दिसत आहे. तसेच कपडे उत्पादन करणाऱ्या कंपन्या जवळपास ४०० वर्षे चालल्या; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले मराठा साम्राज्य हे १७५ वर्षांतच गुंडाळले. त्याला कारण म्हणजे मराठा समाजातील भाऊबंदकी होय. भाऊबंदकी म्हणजे मराठ्यांचे आवडते क्षेत्र आहे. प्रसंगी विरोधकांना मदत झाली तरी चालेल या वृत्तीनेच १७५ वर्षांतच मराठा साम्राज्य गुंडाळले. हे आताच्या मराठ्यांनी लक्षात घ्यावे, असे बाबा भांड यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :maratha mahasanghमराठा महासंघkolhapurकोल्हापूर