शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

५ नोव्हेंबरपासून धुराडी पेटणार

By admin | Published: October 19, 2016 12:31 AM

कोंडी फुटणार : मंत्री समितीच्या बैठकीत आज निर्णय

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास सरकारकडून ‘हिरवा कंदील’ मिळणार आहे. याबाबत आज, बुधवारी होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस निर्माण झालेली हंगामाची कोंडी फुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत १ डिसेंबरपासून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. उसाच्या कमतरतेचे कारण पुढे करत हंगाम लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याचा फटका प. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना बसणार आहे. कर्नाटकातील कारखाने १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने सीमाभागातील ऊस तिकडे जाण्याची अधिक आहे. परिणामी, महाराष्ट्रातील कारखाने अडचणीत येणार आहेत. यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हंगाम सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कारखानदारांची होती. याबाबत शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार पुन्हा मंत्री समितीची बैठक बोलावून बदल करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आज दुपारी एक वाजता मुंबईत मंत्री समितीची बैठक होत आहे. १ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी आहे, त्यामुळे ५ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कारखानदारांसह शेतकरी संघटनेची आहे. त्यामुळे मंत्री समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार हे निश्चित आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस हंगामाबाबत झालेली कोंडी फुटणार आहे. (प्रतिनिधी)मंत्री समितीच्या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व आमदार जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.