शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
3
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
4
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
5
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
6
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
7
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
8
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

पोलीस अधीक्षकांच्या निरोपाने सहकारी बनले भावनाविवश

By admin | Published: December 10, 2015 1:11 AM

जीपमधून मिरवणूक : कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार

कोल्हापूर : बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली झालेल्या पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांचा बुधवारी पोलीस दलाने कोल्हापुरी फेटा बांधून विशेष सत्कार केला. गेल्या दोन वर्षांत त्यांनी सहकाऱ्यांना आपुलकी, जिव्हाळा आणि खंबीर पाठिंबा दिल्याने त्यांना निरोप देताना अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी भावनाविवश झाले. डॉ. शर्मा यांनी १९ फेब्रुवारी २०१४ रोजी कोल्हापूर पोलीस अधीक्षकपदी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर राजकीय संघर्ष, फोफावलेल्या अवैध व्यवसायांसह गुन्हेगारी टोळ्यांना चाप लावण्यासाठी दंडुक्यापेक्षा कायद्याचा धाक दाखविण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा छडा लावण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. हत्येनंतर अवघ्या सहा महिन्यांत त्यांनी समीर गायकवाड या संशयितांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. २२ महिन्यांच्या कमी कालावधीमध्ये त्यांनी गुन्हेगारी टोळ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले. साडेसात कोटींचा ‘सीसीटीव्ही प्रकल्प’, महिला मोबाईल पेट्रोलिंग पथक, ‘समाधान योजना’,‘व्हॉट्स अ‍ॅप’ हेल्पलाईन, आदी योजना सुरू केल्या. त्यांची बृहन्मुंबई उपायुक्तपदी बदली झाल्याचे वृत्त समजताच त्यांची बदली रद्द करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या. बुधवारी त्यांनी नूतन पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याकडे सूत्रे सोपविली. त्यानंतर अलंकार हॉल येथे कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी प्रशासनाने त्यांचा कोल्हापुरी फेटा बांधून विशेष सत्कार केला. जीपमधून त्यांची मिरवणूकही काढण्यात आली. गेल्या दोन वर्षांत त्यांनी आपुलकी, जिव्हाळा आणि खंबीर पाठिंबा दिल्याने त्यांना निरोप देताना अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी भावनाविवश झाले होते.कोल्हापूरने कधीही न विसरण्यासारख्या आठवणी दिल्या आहेत. प्रेम आणि सन्मान दिला आहे. मी या सर्वांचा ऋणी राहीन. - डॉ. मनोजकुमार शर्मा तत्कालीन पोलीस अधीक्षक