शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

सात हजार पोलिसांचा ४८ तास खडा पहारा, तमिळनाडू, मध्यप्रदेश परिक्षेत्रातील स्पेशल फोर्स तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 12:41 IST

लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांनी ४८ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवले. कागल, कदमवाडी, कनाननगर येथे किरकोळ वादावादीचे प्रकार सोडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मध्यरात्रीपर्यंत मतपेट्या जमा केल्यानंतर ‘हुश्श... सुटलो एकदा!’ असे म्हणत बंदोबस्तावरील पोलिसांचे चेहरे आनंदाने खुलले.

ठळक मुद्देपोलिसांचा ४८ तास खडा पहारा तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांचा समावेश

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांनी ४८ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवले. कागल, कदमवाडी, कनाननगर येथे किरकोळ वादावादीचे प्रकार सोडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मध्यरात्रीपर्यंत मतपेट्या जमा केल्यानंतर ‘हुश्श... सुटलो एकदा!’ असे म्हणत बंदोबस्तावरील पोलिसांचे चेहरे आनंदाने खुलले.लोकसभा निवडणूक बंदोबस्ताची तयारी पोलीस प्रशासनाने दोन महिन्यांपासून केली होती. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कानोसा घेतला होता. या निवडणुकीत पोलीस प्रशासनाने अतिशय अभ्यासपूर्वक नियोजन केले होते.

परराज्यांतून व परजिल्ह्यांतून आलेल्या पोलिसांची गैरसोय होऊ नये, अशी त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय केली होती. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी ३०० पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले. अवैध धंद्यांवर छापे टाकून त्या व्यावसायिकांना सळो की पळो करून सोडले. निवडणुकीची आचारसंहिता सुरू होताच सर्व पोलिसांच्या सुट्या, रजा रद्द केल्या. ४० दिवस पोलीस रात्रंदिवस रस्त्यांवर उतरून बंदोबस्त करीत होते. प्रचारसभा, मिरवणुकीच्या बंदोबस्ताचा पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण होता.निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूर परिक्षेत्रातील स्पेशल फोर्सचे दोन हजार पोलीस बंदोबस्तासाठी कोल्हापुरात दाखल झाले. रविवारी सकाळी प्रत्येक पोलीस ठाण्यानुसार बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले होते. निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी सुमारे सात हजार पोलीस जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. संवेदनशील मतदारसंघांत पोलिसांची जादा कुमक तैनात केल्याने कोणत्याही गैरप्रकारांना संधी मिळाली नाही.

इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण, जयसिंगपूर, कागल, मुरगूड, शाहूवाडी, कोडोली, पन्हाळा, आदी ठिकाणी राज्य राखीव दलाचे जवान तैनात असल्याने वादावादीचे प्रकार घडले नाहीत. मतदान केंद्रावर व परिसरात पोलीस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते. खासगी व शासकीय वाहनांतूनही पोलीस पेट्रोलिंग करीत होते. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांसाठी चहा-नाष्टा, जेवणाची सोय स्वतंत्रपणे केली होती. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी दोन महिने पोलिसांनी खूप मेहनत घेतली. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगले