शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

सांगलीचा नितीन कोळी सीमेवर लढताना शहीद

By admin | Published: October 30, 2016 12:27 AM

दुधगाववर शोककळा : दिवाळी साजरी न करण्याचा गावाचा निर्णय -पुण्यात आज पार्थिव

सांगली/दुधगाव : दुधगाव (ता. मिरज) येथील सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान नितीन सुभाष कोळी (वय २८) जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडाजवळील मच्छली सेक्टर येथे शुक्रवारी मध्यरात्री शहीद झाले. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. ते शहीद झाल्याचे वृत्त समजताच दुधगाववर शोककळा पसरली. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून आणि दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. नितीन कोळी यांच्या पश्चात आई सुमन, वडील सुभाष, भाऊ उल्हास, पत्नी संपदा, मुले देवराज व युवराज असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव विमानाने रविवारी दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येणार आहे. तेथून दुधगाव या त्यांच्या जन्मगावी आणण्याचे प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. नितीन कोळी यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. २००८ मध्ये ते सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. शुक्रवारी ते सहकाऱ्यांसोबत जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाजवळील मच्छली सेक्टरजवळ कर्तव्य बजावत होते. रात्री साडेनऊ वाजता पाकिस्तानच्या सैनिकांकडून गोळीबार सुरू झाला. यावेळी झालेल्या चकमकीत कोळी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले होते. उपचार सुरू असताना मध्यरात्री अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कोळी शहीद झाल्याचे वृत्त शनिवारी सकाळी गावात येऊन धडकले. त्यांच्या कुटुंबास बऱ्याच वेळानंतर माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून दुपारी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शोकसभा घेऊन कोळी यांना आदरांजली वाहिली. गावात दिवाळी साजरी करायची नाही तसेच कोणीही फटाके फोडायचे नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा आडमुठे, उपसरपंच संजय देशमुख, पंचायत समिती सदस्य प्रमोद आवटी, विश्वास कोळी, विलास आवटी उपस्थित होते. घरावर लावण्यात आलेले आकाशदिवे ग्रामस्थांनी स्वत:हून काढले. गावातील प्रमुख कर्मवीर चौकासह सर्वत्र दिवसभर शुकशुकाट होता. कोळी यांचे पार्थिव रविवारी पुण्यात आणण्यात येणार आहे. तेथून दुधगाव येथे आणले जाणार आहे. (प्रतिनिधी)कुटुंबाचा आधार हरपलाकुटुंबाचा आधार हरपलाशहीद जवान नितीन कोळी यांचे वडील सुभाष कोळी म्हणाले की, लहानपणापासून नितीनची सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. आमची घरची परिस्थिती बेताचीच होती, तरीही मी कष्ट करून नितीनला शिकविले. सैन्यात भरती होण्यासाठी त्याला आम्ही पाठबळ दिले. भरती होण्यासाठी त्यानेही खूप कष्ट केले. त्याच्या कष्टाला यश मिळाले. आठ वर्षांपूर्वी तो भरती झाला. तो शहीद झाल्याने कुटुंबाचा आधार गेला असून, फार मोठे नुकसान झाले आहे. ते कधीही न भरून येणारे आहे.\पत्नीशी चार दिवसांपूर्वीच मोबाईलवर संपर्क नितीन कोळी यांनी चार दिवसांपूर्वी पत्नी संपदा यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून कुटुंबाची विचारपूस केली होती. ५ नोव्हेंबरला गावी सुटीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले, पण शुक्रवारी रात्री गोळीबारात ते शहीद झाले. पत्नीशी मोबाईलवर बोलल्यानंतर काही दिवसांतच ते शहीद झाल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. शनिवारी दुपारपर्यंत घरी वडील व भावालाच ते शहीद झाल्याचे माहीत होते. मे महिन्यात सुटीलानितीन कोळी मे महिन्यात गावाकडे सुटीला आले होते. नवरात्रौत्सवात ब्रह्मनाथ कल्चरल ग्रुपतर्फे गावातील सैन्य दलात असलेल्या जवानांचा सत्कार ठेवण्यात आला होता. त्यावेळी ३२ जवान सुटीसाठी गावाकडे आले होते. या सर्वांचा सत्कार केला होता, पण या कार्यक्रमास कोळी यांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांची पत्नी संपदा यांचा सत्कार करण्यात आला होता. घराजवळ शुकशुकाटदुधगावातील कर्मवीर भाऊराव पाटील चौकालगत कोळी यांचे घर आहे. शनिवारी दुपारी घराजवळ शुकशुकाट होता. पत्नी व आईला ते शहीद झाल्याचे सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे घराचे लोखंडी गेटही बंद केले होते. शेजारील चार-पाच ग्रामस्थ तेथे बसून होते. कोळी यांची मुले देवराज (वय चार) आणि युवराज (वय दोन) घरातच होती.